Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केवळ जय जवान, जय किसान नाही तर जय कामगार ही आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Get real time updates directly on you device, subscribe now.

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कामगार संरक्षणाची भूमिका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि २० फेब्रुवारी: जय जवान , जय किसान यासोबतच जय कामगार अशी घोषणाही महत्वाची आहे. कामगार हा देशाचे अर्थचक्र चालवतो त्यामुळे गुंतवणुकीच्या जोडीने रोजगार किती निर्माण होतो आणि या कामगार वर्गाचे संरक्षण यालाही तितकेच महत्व आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते आज नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की , लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान अशी घोषणा दिली. पण माझे वडील बाळासाहेब नेहमी म्हणायचे की या जोडीने जय कामगार ही घोषणा पण महत्वाची आहे. कारण जसे शेतकरी पीक पिकवतो व खाऊ घालतो, जवान हे देशाच्या सीमेचे संरक्षण करतात तसेच कामगार हा अर्थचक्र चालवतो. त्यांना पुरेसे संरक्षण मिळालेच पाहिजे. उद्योगांतून केवळ किती भांडवल येते हे महत्वाचे नाही तर रोजगार निर्मिती किती झाली त्याला महत्व आहे असेही ते म्हणाले केंद्र सरकारने यादृष्टीने कामगारांना संरक्षण मिळेल असे पाहिले पाहिजे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.