अतिवृष्टी व पुरामुळे तसेच ” क्यार ” व” महा ” चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त यांना लवकरच अनुदान वाटप करणार जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पालघर डेस्क दि 6 : जुलै – ऑक्टोबर २०१ ९ मधील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत देण्यासाठी रक्कम रुपये १२५३९०००० / – ( अक्षरी बारा कोटी त्रेपन्न लाख नव्वद हजार रुपये मात्र ) अनुदानाची मागणी करण्यात आली होती . त्यापैकी रक्कम रुपये ६२६९५५००/ -( अक्षरी सहा कोटी सव्वीस लाख पंच्याण्णव हजार पाचशे रुपये मात्र ) इतके अनुदान शासन महसूल व वन विभाग यांचेकडून प्राप्त झालेले आहे. सदरच्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करणेबाबत जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांना आदेश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.
तसेच ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१ ९ मध्ये झालेल्या ” क्यार ” व ” महा ” चक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत देण्यासाठी रक्कम रुपये ४२७४७८००० / – ( अक्षरी बेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख अठ्याहत्तर हजार रुपये मात्र ) अनुदानाची मागणी करण्यात आली होती . त्यापैकी रक्कम रुपये ३८ ९ ५६७००० / – ( अक्षरी अडोतीस कोटी पंच्याण्णव लाख सदुसष्ट हजार रुपये मात्र ) इतकी मदत बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली होती . उर्वरीत रक्कम रुपये ३७ ९ ११००० / – ( अक्षरी तीन कोटी एकोणऐंशी लाख अकरा हजार रुपये मात्र ) इतके अनुदान शासन , महसूल व वन विभाग , मंत्रालय मुंबई यांचेकडून प्राप्त झालेले आहे . सदरच्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करणेबाबत जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांना आदेश देण्यात असून ते लवकरच नुकसानग्रस्त यांना प्राप्त होतील असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यानी सागितले.

Comments are closed.