Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तेव्हा भाजप नेत्यांना ‘आणीबाणी’ का आठवत नाही ? आमदार रोहित पवार यांचा भाजप नेत्यांना सवाल.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क:- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना झालेल्या अटके बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते, देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेते महा विकास आघाडी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. भाजप नेत्यांना थेट आणिबाणीची आठवण झाली आहे. तर काही जण अर्णव गोस्वामी यांना अटक म्हणजे लोक्षावरचा हल्ला असल्याची ओरड केली जात आहे. भाजपच्या या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. रोहित पवार यांनी “सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करताना,द वायर, NDTV, द प्रिंट यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देताना भाजप नेत्यांना ‘आणीबाणी’ आठवत नाही.पण पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या ‘अभिनेत्यावर’ कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं.” असा टोला लगावला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील तसेच आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या बहुसंख्य नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम!
आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे.” असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मात्र आमदार रोहित पवार यांनी केंद्रातल्या मोदी सरकारने सरकारच्या विरोधात भूमिका मांडणाऱ्या प्रसारमाध्यमांना कशा प्रकारे त्रास दिला याची आठवण करून देत भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच अर्नब गोस्वामी चा उल्लेख अभिनेता असा करून ” पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या ‘अभिनेत्यावर’ कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं.”. असा सवाल उपस्थित केला आहे.

Comments are closed.