Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वराज्य फाउंडेशनचा संवेदनशील सेवाकार्याला मानाचा मुजरा – संविधान ग्रंथ व सन्मानचिन्ह देऊन सुसंस्कारित सन्मान

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, २४ जून : गरिबांच्या आक्रोशाला शब्द, अडचणीतल्या चेहऱ्यांना आधार, आणि संकटसमयी झेपावणारा माणुसकीचा हात — हेच जर खरे समाजसेवकत्व असेल, तर ‘स्वराज्य फाउंडेशन’ हे त्याचं जिवंत प्रतीक आहे.

आलापल्ली येथील वीर बाबूराव शेडमाके सभागृहात एका अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमात स्वराज्य फाउंडेशनचा संविधान ग्रंथ आणि सन्मानचिन्ह देऊन सुसंस्कारित सत्कार करण्यात आला. हा गौरव सोहळा सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच खऱ्या अर्थाने समाजसेविका असलेल्या सुशीला बुद्धभगवान भगत यांच्या हस्ते संपन्न झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्वराज्य फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून गरजू, वंचित, संकटग्रस्त नागरिकांच्या आयुष्यात दिवा पेटवत आहे. पुरपरिस्थिती असो वा आजारपण, मध्यरात्रीच्या टेलीफोनवर धावून जाणे असो वा रक्तदात्यांचा शोध, या संस्थेने समाजाच्या प्रत्येक आक्रोशाला उत्तर दिलं आहे.

रुग्णवाहिका सुविधा, रक्तदान समन्वय, अन्न-वस्त्र पुरवठा, शिक्षणासाठी मदत आणि अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीत जीव धोक्यात घालून केलेली मदत ही त्यांची सामाजिक बांधिलकी दाखवते. त्यांचं कार्य केवळ सेवाभावातून नाही, तर ‘संकटात देव शोधण्याऐवजी, देवासारखा माणूस शोधावा’ यावर विश्वास ठेवणाऱ्या विचारातून उगम पावलेलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्याची दखल घेत सुशीला भगत म्हणाल्या, “स्वराज्य फाउंडेशनचे सदस्य गेल्या अनेक वर्षांपासून इतके प्रभावी काम करत आहेत, की आपण त्यांना सोनं–चांदी देऊ शकत नाही. पण आपण त्यांना शाब्दिक आधार देऊ शकतो, आणि भारताच्या संविधानाचा ग्रंथ देऊन त्यांच्या कामाचे मूल्यांकन करू शकतो.”

त्यांच्या हृदयस्पर्शी भाषणात स्वराज्य फाउंडेशनसारख्या संस्थांना केवळ सामाजिक नव्हे, तर नैतिक आणि संवैधानिक शक्ती मिळावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली. प्रत्येक सदस्याला संविधान ग्रंथ देणं हे फक्त सन्मान नव्हे, तर समाजकार्याला प्रेरणा देणारं प्रतीक ठरलं.

या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने समाजसेवेचा एक आदर्श उभा राहिला आहे — की ‘देणं’ म्हणजे फक्त वस्तूंची देवाणघेवाण नसते, तर हृदयातून दिलेला आदर, एक शब्द, एक सन्मान, एक ग्रंथही कोणाचं जीवन अधिक अर्थपूर्ण करू शकतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.