Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या नव्या सूचना केल्या जारी, ऑफिसला 50% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत होणार कामकाज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, 19 मार्च : महाराष्ट्रात पुन्हा एकदा वेगाने कोरोना संसर्ग (Coronavirus) पसरू लागल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसंच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती (50 percent staff attendance in the office) ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आपली वाटचाल लॉकडाऊनच्या (Lockdown) दिशेने सुरू झाली आहे का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे, असंही शासनाने आपल्या नव्या आदेशात म्हटलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सरकारच्या आदेशात आणखी कशाचा उल्लेख?

नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी तसंच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नाट्यगृहांना नवे नियम कोणते?

1. मास्क परिधान केल्याशिवाय प्रवेश करण्यास परवानगी नाही.

2. ताप असलेल्या कुणालाही प्रवेश मिळणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी वापरण्यासाठी तापमान मोजण्यासाठी साधने

3. वेगवेगळ्या सोयीस्कर ठिकाणी पुरेशा हात सॅनिटायझर्स ठेवल्या पाहिजेत.

4. अंमलबजावणीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी संबंधित आस्थापने

दरम्यान, नव्या आदेशाचं पालन न केल्याचं कडक कारवाई केली जाईल, असा इशारा शासनाकडून देण्यात आला आहे.

Comments are closed.