Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारत जोडो यात्रेत आदिवासी बांधवांनी हजारोच्या संख्येनी उपस्थित राहावे

माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे आव्हान, महागाव येथे शासकीय विश्रामगृहावर पार पडली बैठक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

यवतमाळ, 08 नोव्हेंबर :-  राहुल गांधीची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात पोहचली असून साध्य राहुल गांधी हे नांदेड जिल्ह्यात आहेत तर 15 नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रा ही वाशीम जिल्ह्यात पोहचणार आहे. तर 15 नोव्हेंबर रोजी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची जयंती आहे. आणि याच पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यासह यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बांधव राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील बोराडा फाटा अंजनखेड येथे पोहचणार आहे. तर या भारत जोडो यात्रेत 15 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यासह महागाव तालुक्यातील आदिवासी बांधवांनी हजारोच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवावी असे आव्हान यवतमाळ जिल्ह्याचे आदिवासी नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले आहे.

या अनुषंगाने माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाखाली आज महागाव येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली. तर यावेळी तालुक्यातील आदिवासी बांधवासह महागाव तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष शिवाजी देशमुख तसेच महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा वनमालाताई राठोड, तसेच संभाजी नरवाडे, नवाब जानी सह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.