Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘बिपरजॉय’चा धोका वाढला, रेल्वेने 67 गाड्या केल्या रद्द

बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी कच्छमध्ये धडकण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 13 जून – बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. काल सोमवारी (ता. 12 जून) हे वादळ मुंबईला धडकणार असल्याचे बोलले जात होते. परंतु हे वादळ पुढे सरकल्याने आता हे वादळ गुजरात आणि पाकिस्तानला धडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता रेल्वे विभागाकडून देखील विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अरबी समुद्रातील हे चक्रीवादळ गुरुवारी कच्छमध्ये धडकण्याची शक्यता आहे. बिपरजॉयच्या प्रभामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळू लागल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील किनारी भागातून 7500 लोकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे. त्याचबरोबर तीन्ही सैन्यदल अलर्ट मोडवर आहेत. तर पश्चिम रेल्वेकडून गुजरातच्या किनारपट्टी भागात जाणाऱ्या 67 गाड्या रद्द केल्या आहेत. दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रातल्या समुद्र किनाऱ्यावरील गावांना देखील हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात देण्यात आला आहे.

पुढील 2-3 दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मेघगर्जनांसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे . हवामान खात्याने विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. नशिक,रत्नागिरी, रायगड, पालघर, छ. संभाजीनगर, सोलापूर, सांगलीसह राज्यातील इतर शहरांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर, 15 जून रोजी चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील इतर भागात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.