Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आज पहिल्या क्वालीफायर मध्ये मुंबई इंडियन्सची गाठ आज दिल्ली कॅपिटल्सशी .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

वृत्तसंस्था, दि. ०५ नोव्हें : १३ वा इंडियन प्रीमियर लीगचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून आज सायंकाळी रंगनाऱ्या पहिल्या क्वालीफायर सामन्यात मुंबई इंडियन्सची गाठ दिल्ली कॅपिटल्सशी पडणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत आपले स्थान पक्के करणार आहे. आणि आज हरणाऱ्या संघाला क्वालीफायरचा पुन्हा एक सामना खेळून अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुन्हा एक संधी मिळणार आहे.

चार वेळा आयपीएल चे विजेते पद पटकावणाऱ्या मुंबई  इंडियन्सने १४  पैकी ९ सामने जिंकत १८ गुणांनिशी गुणतालीकेवर वर्चस्व गाजविले, मात्र अखेर च्या सामन्यात त्यांना सनरायसर्स हैद्राबादकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागल्याने त्यांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला आहे. तर पहिलेवहिले विजेते पद पटकावण्यासाठी आतुर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने सलगच्या चार पराभवानंतर रॉयल्स चॅलेजर्स बँगलुरुला ६ गडी राखून पराभूत करत आपली गाडी रूळावर आणली आहे. दिल्लीने १६ गुणांसह दुसरे स्थान पटकाविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन ही मुंबईसाठी जमेची बाजू आहे. मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रोहितला चार सामन्यांना मुकावे लागले होते. पण सनरायसर्सविरुद्ध त्याला अपेक्षित पुनरागमन करता आले नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी या आघाड्यांवर मुंबईचा संघ सक्षम आहे. मात्र सनरायजर्स विरुद्ध मुंबईची फलंदाजी ढेपाळली होती. त्यामुळे दिल्ली विरुद्धच्या महत्वपूर्ण सामन्यात मुंबईला कामगिरी उंचवावी लागणार आहे.

मुंबईची सलामीची जोडी तुफान बहरात असून ईशान किशन आणि क्विटन डीकोक हे आतापर्यंत मुंबईच्या यशाचे भागीदार बनले आहेत. किशनने आतापर्यंत ४२८ तर क्विटन डीकोक ने ४४३ धावा केले आहेत. त्यांना रोहितची तितकीच तोलामोलाची साथ मिळाली आहे. सुर्याकुमार यादव ने ही महत्वाच्या क्षणी अप्रतिम खेळी करत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिले आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत ४१० धावा जमा आहेत. हाणामारीच्या षटकांमध्ये हार्दिक पंड्या २४१ धावा, पोलार्ड २५९ धावा यांनी चमक दाखविली आहे. मुंबई च्या वेगवान गोलंदाजीची प्रमुख भिस्त जसप्रीत बुमराह आही ट्रेन्ट बोल्ट यांच्यावर असून त्यांनीही आपापली जबाबदारी आतापर्यंत चोखपणे निभावली आहे. जसप्रीत बुमराह ने २३ तर ट्रेन्ट बोल्ट ने २० बळी मिळविले आहे. फिरकीपटू राहुल चाहर त्यांना उत्तम साथ देत असून त्याने १५ बळी आपल्या नावावर केले आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सची मदार ही एक दोन फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. सलामीवीर शिखर धवन तुफान फार्मात असून त्याचे दोन शतके आहे. तीन अर्धशतकांसह ५२५ धावा फटकावले आहेत. मात्र महत्वाच्या सामन्यात त्याची बॅट किती तळपते यावर दिल्ली चे भवितव्य अवलंबून असेल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबईकर पृथ्वी शाँ  दिल्ली साठी फारसा फलदायी ठरला नाही. पृथ्वी २२८ आणि ऋशब पंत २८२ यांची कामगिरी हाच दिल्लीसाठी चिंतेचा विषय आहे. वेस्ट इंडीज च्या शिमरोन हेटमायर १३८ आणि मार्कस स्टायनस २४९ हे सुद्धा भरीव योगदान देऊ शकले नाहीत. मुंबईकर अजिंक्य राहणेला गवसलेला सूर दिल्लीसाठी महत्वाचा ठरू शकतो. राह्नेने बंगळूरू विरुद्ध ६० धावांची खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला होता. त्याच बरोबर कर्णधार श्रेयस अय्यर ४२१ आपल्यावरील जबाबदारी चोखपाने पार पाडत आहे. गोलंदाजीत रबाडा २५ बळी आणि आनरिख नॉर्कीया १९ बळी या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाज्यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. फिरकीपटू आर. अश्विन आणि अक्षर पटेल हे प्रतिस्पर्धी फलंदाजावर वर्चस्व गाजवण्यात काहीसे यशस्वी ठरले आहे. साखळी फेरीत मुंबई ने दोन्ही वेळेला दिल्लीला हरविले आहे. त्यामुळे या सामन्यातही मुंबईचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम वर आज संध्याकाळी ७.३० वाजता  रंगणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.