Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऐकावे ते नवलच ! एका वराने चक्क दोन वधूंसोबत एकाच मांडवात बांधली लगीन गाठ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायपूर दि .०७ जानेवारी : सोशल मीडियावर कोण केव्हा काय व्हायरल करणार हे सांगता येत नाही . असाच एक लग्नाचा असा एक प्रकार सध्या तुफान व्हायरल झाला आहे. आता तुम्ही एका जोडप्याचं लग्न एकत्र होताना पाहिलं असेल, पण एकाच वराने चक्क दोन वधूंसोबत एकाच वेळी लगीन गाठ बांधल्याचं समोर आलं आहे. या लग्नाचा चर्च्या हि  एकाच मांडवात दोन नवऱ्या आणि एक नवऱ्याची ही कहानी नेटकऱ्यांच्याही पसंतीस मोठ्याने आला  आहे .

ही घटना छत्तीसगडमधील आहे. कारण, एका मुलाने एकाच मांडवात दोन मुलींशी लग्न केलं. दोन्ही मुलींना एकच मुलगा आवडला. त्यामुळे नवरदेवाने दोघांशीही लग्न केलं. चंदू मौर्य असं या नवरदेवाचं नाव आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही तरुणींनी परस्पर संमतीने चंदू मौर्यशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तसा चंदू हा एक शेतकरी कुटुंबातील आहे. एक वर्षापूर्वी चंदू सुंदरी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. त्यानंतर त्याने तिला आपल्या घरी आणलं. अगदी एका महिन्यानंतर, त्याला हसीना नावाच्या दुसर्‍या मुलीशीही प्रेम झालं. त्याने तिलाही घरी आणलं आणि तिघे एकत्र राहू लागले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तिघेही अगदी आनंदाने एकमेकांसोबत राहत होते. म्हणूनच जवळपास वर्षभर एकत्र राहिल्यानंतर तिघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वर आणि दोन नववधू हे एकत्र राहतात आणि त्यांच्यात काहीही वाद होत नाही यावरून गावात सगळ्यांनाच आश्चर्य झालं. खास गोष्ट म्हणजे दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी लग्नाचा हा निर्णय आनंदाने स्वीकारला. मुलीकडून मुलीला ग्रीन सिग्नल मिळाल्यास चंदूच्या घरच्यांनीही या लग्नास सहमती दर्शविली. ०३  जानेवारी २०२१ रोजी या तिघांचा लग्नसोहळा पार पडला. ज्यात सुमारे ६०० लोकांनी हजेरी लावली. या खास लग्नात गावातील सगळ्यांनीच मोठा जमाव केला होता. चंदूच्या कुटूंबासह दोन मुलींचे कुटुंब या लग्नात हजेरी लावून मोठ्या जल्लोषात सोहळा पार पडला.

Comments are closed.