Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी यांना आज मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही; उद्या होणार सुनावणी!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई डेस्क:  रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी यांना आजही उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार असून उद्या जामीन मिळणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!

अर्णव गोस्वामी यांनी अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी जामीन मिळावा आणि एफआयआर रद्द करावा म्हणून याचिका दाखल केली होती. त्यावरील युक्तिवाद पूर्ण न झाल्याने ही सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तर, अलिबाग पोलिसांनीही अलिबाग सत्र न्यायालयात याचिका दाखल करून अर्णव यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे. त्यावरही उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या मुंबई उच्च न्यायालय आणि अलिबाग सत्र न्यायालयात काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अर्णव यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असल्याने त्यांना पुन्हा एकदा अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत जावं लागणार आहे. अर्णव गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आरोपींना थेट जेलमध्ये न नेता क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे या तिघांना नगरपालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.