Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गरम पाण्याने चेहर्याची स्कीन होते खराब

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर :- हिवाळ्यात बहुतेक लोक गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदेही आहेत. परंतु अनेकांना कदाचित माहीत नसेल की, चेहर्यावर गरम पाण्याचा वापर केल्याने त्वेच्या पेशी खराब होतात. कारण चेहर्याची त्वचा शरीरापेक्षा जास्त संवेदनशील आणि नाजूक असते. थंडीत गरम पाण्याने चेहरा धुतल्याने तुम्हाला आराम वाटू शकतो. परंतु असे नियमित केल्यास त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. गरम पाण्यामुळे चेहरा कोरडा आणि रूक्ष होउ शकतो.

आरोग्य साईट डाॅट काॅमच्या माहितीनुसार, संपूर्ण शरीरात चेहर्याची त्वचा ही सर्वात नाजूक आणि संवेदनशील असते. ज्यामध्ये चेहर्याच्या त्वचेखाली रक्तवाहिन्या आणि पेशी आणि छिद्र असतात. जास्त गरम पाणी वापरल्याने चेहर्याच्या पेशींना नुकसान होण्याचा धोका असतो. यामुळे त्वचेवर जळजळ, दाह होउ शकतो किंवा चेहर्यावर लालसरपणा आणि पुरळ येण्याची समस्या निर्माण होउ शकते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तज्ज्ञांच्या मते, कोमट पाण्याने तुमचा चेहरा धुतल्याने तुमच्या त्वेचतील आवश्यक नैसर्गिक ऑईल निघून जाउ शकते. ज्यामुळे त्वचा कोरडी होउन त्यावर भेगा पडू शकतात. गरम पाण्याने चेहर्याला रिलॅक्स वाटत असेल तरी त्यामुळे त्वचेचे अनेक नुकसान होउ शकते. नियमितपणे गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेा अनेक समस्या होउ शकतात. कारण गरम पाण्याचा वापर केल्याने कोलेजन आणि सेबम कमी होण्यास सुरूवात होते. त्यामुळे त्वचा खराब होउन लवकर वृध्द दिसू लागतात.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.