चंद्रपूर जिल्ह्यात आज तीन मृत्युसह ३६४ कोरोना बाधित तर १८६ कोरोनामुक्त
- आतापर्यंत २५९४६ जणांची कोरोनावर मात
- ॲक्टीव पॉझिटिव्ह २७२५
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. ४ एप्रिल : जिल्ह्यात मागील २४ तासात १८६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर ३६४ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २९ हजार १०६ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २५ हजार ९४६ झाली आहे. सध्या २७२५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ८२ हजार १५० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ४९ हजार ३३२ नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये नागभिड येथील ७४ वर्षीय पुरूष, चिमुर येथील ५७ वर्षीय पुरूष व घुग्घुस येथील ६२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३५ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३९५, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २०, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या ३६४ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील १२४, चंद्रपूर तालुका ४४, बल्लारपूर १४, भद्रावती १८, ब्रम्हपुरी २४, नागभिड १४, सिंदेवाही तीन, मूल १२, सावली ११, गोंडपिपरी ३, राजूरा ६, चिमूर ३१, वरोरा २०, कोरपना १८, जीवती ११ व इतर ठिकाणच्या ११ रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
Comments are closed.