Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अर्णब गोस्वामी आणि भाजप कनेक्शन मुळेच गोपनीयता झाली भंग

Get real time updates directly on you device, subscribe now.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलाय संशय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

वर्धा दि. २१ जानेवारी :- अर्णब गोस्वामी यांचे चॅटचे जे संभाषण आहे, त्या चॅटमध्ये २६  फेब्रुवारीला बालकोटचा जो हल्ला झाला त्याची माहिती अर्णब गोस्वामीकडे कशी आली हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नॅशनल सिक्युरिटीच्या दृष्टीने ही फार गंभीर बाब आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून ही माहिती गोस्वामीला गेलीं का हे केंद्र सरकारने पडताडून पाहिले पाहिजे, ही माहिती अर्णब गोस्वामीकडे जाणे म्हणजे गोपनियतेचा भंग आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एखाद्या ठिकाणी अशाप्रकारचा हल्ला करायचा असेल तर त्याची माहिती केवळ प्रधानमत्र्यांना राहते, सुरक्षा मंत्रालयाला राहते मग ही माहिती गोस्वामीकडे गेली कशी? असा प्रश्न उपस्थित करून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप नेत्यांचे अर्णब गोस्वामी यांच्याशी असलेले संबध याला कारण ठरत असल्याची टीका भाजपवर केली आहे. वर्ध्यात गृहमंत्री अनिल देशमुख आले असताना त्यांनी पोलीस विभागाचा आढावा घेतल्यानंतर ही टीका केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.