Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा महाड चवदार तळे येथे गर्दी करू नका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 16 मार्च: महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथील चवदार ताळ्यावर केलेल्या पाण्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाचा यंदा 94 वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी 20 मार्चला लाखो आंबेडकरी अनुयायी महाड चवदार तळे येथे एकत्र येऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांनी चवदार तळे येथे केलेल्या क्रांतीला अभिवादन करतात. यंदा मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आंबेडकरी जनतेने येत्या दि. 20 मार्च रोजी चवदार तळे येथे गर्दी करू नये असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

देशात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढत आहे. त्यामुळे यंदा चवदार तळे येथे आंबेडकरी जनतेने गर्दी करू नये. राज्यात सर्वांनीच गर्दी चे कार्यक्रम टाळावेत. रिपब्लिकन पक्षाची महाराष्ट्र प्रदेश ची राज्य कार्यकारीणी ची महत्वपूर्ण बैठक येत्या दि. 27 मार्च रोजी जळगाव मध्ये आयोजित केली होती मात्र वाढत्या कोरोना च्या प्रादुर्भावामुळे दि.27 मार्च ची रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारीणीची बैठक रद्द करण्यात आली आहे. बैठकीची पुढील तारीख नंतर कळविण्यात येईल अशी घोषणा ना. रामदास आठवले यांनी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.