चंद्रपूर जिल्ह्यात आज एका मृत्युसह ३३५ नवीन कोरोना बाधितांची नोंद तर १९१ कोरोनामुक्त
- आतापर्यंत २५,७६० जणांची कोरोनावर मात
- ॲक्टीव पॉझिटिव्ह २५५०
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. ३ एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यात मागील २४ तासात १९१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर ३३५ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २८ हजार ७४२ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २५ हजार ७६० झाली आहे. सध्या २५५० बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ७९ हजार ५९० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ४७ हजार ५०३ नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये तुकुम, चंद्रपूर येथील ६१ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३२ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३९२, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २०, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या ३३५ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील १२४, चंद्रपूर तालुका २७, बल्लारपूर १८, भद्रावती सहा, ब्रम्हपुरी ४४, सिंदेवाही १६, मूल सहा, सावली एक, पोंभूर्णा एक, राजूरा तीन, चिमूर ३८, वरोरा २६, कोरपना २३ व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
Comments are closed.