Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई  30 नोव्हेंबर :- पालघर जिल्ह्यातील धानिवरी येथे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार-मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास भीषण असा अपघात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे.

मालवाहू ट्रक आणि ब्रिझा कार मध्ये धानिवरी येथे हा भीषण अपघात झाला असून या अपघातात दीपक अग्रवाल , सुमित्रा अग्रवाल , सत्यनारायण अग्रवाल अशा तिघांचा मृत्यू झाला तर केतन अग्रवाल हा जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने ब्रीझा कारणे मागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून अपघातानंतर काही वेळातच जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.