Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

१०वी, १२वीच्या परीक्षांच्या तारखांबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती!

Get real time updates directly on you device, subscribe now.

12 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतर, तर दहावीची 1 मेनंतर, शिक्षणमंत्र्यांची माहिती दिली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 03जानेवारी:- कोरोनाचं संकट अजूनही नियंत्रणात आलेलं नसताना आता १०वी आणि १२वीच्या परीक्षा होणार की नाही? आणि होणार तर कधी होणार? याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावू लागली आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीच त्याबाबत खुलासा केला आहे. राज्यात १०वीच्या परीक्षा १ मेनंतर आणि १२वीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे राज्यातल्या बोर्डाच्या परीक्षा होणार यावर शिक्कामोर्तब झालं असून त्या नेमक्या किती तारखेला होणार हे जरी निश्चित झालेलं नसलं, तरी किमान कोणत्या कालावधीमध्ये होणार हे स्पष्ट झालं असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना त्यानुसार अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं. या परीक्षा ४ मेपासून सुरू होणार आहेत. तर १० जूनपर्यंत परीक्षा पूर्ण होतील. दोन्ही वर्षांच्या प्रायोगिक परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहेत. परीक्षांचा निकाल १५ जुलै रोजी लागणार आहे. दरम्यान, CBSE च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र बोर्डाच्या राज्यातल्या परीक्षा कधी होणार, याविषयी चर्चा सुरू झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा नक्की कधी घेतल्या जाणार? याची चिंता पालकांमध्ये होती. आता खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच त्यावर भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑक्टोबरमध्ये होणारी एटीकेटी परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. वर्षा गायकवाड यांनी स्वतः याबाबत माहिती दिली होती. दरवर्षी दहावी, बारावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली जाते. मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.