Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

.. पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चूनारकर / गडचिरोली

आरमोरी ,गडचिरोली वनपरिक्षेत्रातील असलेल्या जेप्रा, महादवाडी, चुरचुरा, दिभना या जंगलाच्या बाजूला असलेल्या गावांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे वन विभागाच्या PRT (primary response team) पथकाच्या माध्यमातून जंगल परिसरातील शेतकऱ्याना वाघांच्या हल्ल्याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. मात्र सध्या शेतीची कामं असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतावर जाणे भाग असल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. सातत्याने वन विभागात वाघाच्या हल्ल्यात वाढ होत असल्याने नरभक्षक वाघांचं बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली दि ,28 जुलै : गडचिरोली शहरापासून अवघ्या 16 की.मी अंतरावरील पिपरटोला येथे आणखी एक शेतकऱ्याला वाघाने हल्ला करून ठार केले आहे. खुशाल निकुरे (60) असून धोंडेशिवनी या गावचा आहे. खुशाल यांच्या जंगलात लगत शेती असून शेती मध्ये गुरेढोरे चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केल्याने खुशाल यांचा जागीच मृत्यू झाला.

गडचिरोली जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहेत. गड़चिरोली वन विभागात असलेल्या चातगाव वनपरिक्षेत्रातील खंड क्रं. ४१५ मध्ये आज दुपारी ४:०० ते ४ :३० वाजण्याच्या सुमारास पिपरटोला येथे खुशाल निकुरे हे आपल्या शेतावर जाऊन आपले गुरेढोरे चारत होते. खुशाल निकुरे यांची शेती जंगला लागत असून वाघाच्या भीतीने ती पडीत होती आणि त्याच जागी आपले घरातील गुरेढोर ढोरे चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने खुशाल निकुरे यांच्यावर अचानक हल्ला करून ठार केले. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी दाखल झाले असून तशी तक्रार गडचिरोली पोलीस यांना देण्यात आली असून पुढील कारवाई करत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या खुशाल निकुरे हे परिवारातील कुटुंब प्रमुख असल्याने यांच्यावरच परिवाराची जबाबदारी होती. शेतीचे काम करून आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करीत होते. मात्र त्यांच्या अकाली जाण्याने परिवाराला मोठा धक्का बसला आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असून त्यांचे लग्न झालेले आहेत. वाघाचे वारंवार हल्ले होत असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जवळपास 23 लोकांना वाघाच्या हल्ल्यात आपल्या जीवास मुकावे लागले असल्याने वन विभागाप्रती मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात असून तात्काळ नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हे देखील वाचा :-

गड़चिरोली ब्रेकींग

अहेरीतील लाचखोर पोलीस हवालदार अडकला एसीबीच्या जाळ्यात.
????????

 

https://www.youtube.com/c/LoksparshNews

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.