एस.टी. कर्मचारी संपाविरोधात महामंडळ आज हायकोर्टात अवमान याचिका दाखल करणार तर दुसरीकडे एस.टी. कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर : एस.टी. कर्मचारी संपाविरोधात महामंडळ आज अवमान याचिका हायकोर्टात दाखल करणार आहेत. एकंदरीतच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची चिन्ह दिसत नाही.
दरम्यान, राज्य सरकारने आता थेट एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात आत्तापर्यंत ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार जिल्ह्यात निलंबनाच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच कारवाई झाली तरी संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलीय.
तर दुसरीकेडे एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्यानं आज तिसऱ्या दिवशीही एसटी (ST Workers Strike) रस्त्यावर येण्याची शक्यता नाही. याऊलट संप अधिक चिघळणार असल्याचं दिसतयं.
आज एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा निघणार आहे. यासाठी राज्यभरातून एसटी कामगार मुंबईत दाखल होत आहेत. एसटी कामगारी आपल्या मागण्यांसाठी भाजपच्या नेतृत्त्वात आज मंत्रालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करणार आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याद्वारे एसटी कामगारांना दीर्घ लढाईचं आवाहन केलं आहे.
पोलिसांचा वापर करून मंत्रालयाकडे निघालेल्या #एसटी_कर्मचाऱ्यांना रोखलं जातंय. #लोकशाही मार्गाने चालू असलेल्या #आंदोलनात @advanilparab यांना उद्रेक घडवायचाय का? यांच्या #निजामशाहीमुळे कर्मचाऱ्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याची जबाबदारी #ठाकरे सरकारची राहिल.@CMOMaharashtra pic.twitter.com/5scKAHcg3B
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) November 10, 2021
हे देखील वाचा :
राज्य सरकारची पहिली कारवाई, चंद्रपुरातील लालपरीच्या १४ कर्मचाऱ्यांचं निलंबन
मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? देवेंद्र फडणवीसांचा सवाल
Comments are closed.