लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर : देशात हिवाळ्याचे ऋतु सुरु असतानाच उत्तरेकडून थंड हवेच्या लाट येत निर्माण झाल्याने संपूर्ण देशात थंडीची लाट पाहायला मिळत आहे.. या थंडी मुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याने सर्दी, खोकला यासारखे आजार सुरु असून लहान मुलामध्ये यांचे प्रमाण जास्त आहे. त्यातच देशात HMPV विषाणूचा संसर्ग सुरुवात झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
HMPV हा विषाणू नवीन नसून त्यांची ओळख 2001 साली प्रथम ओळख झाली आणि त्यानंतर तो संपूर्ण जगभर पसरला आहे. हा विषाणू श्वसनमार्गातून हवेच्या माध्यमातून पसरतो आणि सर्व वयोगटांतील लोकांना प्रभावित करू शकतो. विशेषतः हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव सर्वाधिक असतो.
चीनमध्ये HMPV च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याच्या बातम्या मिळाल्यानंतर केंद्र सरकार, आयसीएमआर (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद), आणि एनसीडीसी (राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र) यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) लवकरच यावर आपला अहवाल सादर करेल.
देशात HMPV म्हणजेच ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून नागपूरमध्ये या विषाणूच्या संसर्गाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. देशभरात आतापर्यंत सात जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र, केंद्र सरकारने सांगितले आहे की या प्रकरणांमध्ये वाढ झाली तरी कोविडसारखी परिस्थिती उद्भवणार नसून नागरिकाने घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा,
Comments are closed.