Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुन्हा..वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करुण केले गंभीर जखमी; तर दुसरीकडे बैलावर हल्ला करुण केले ठार

गंगाराम जयराम तिवाडे या इसमाला गंभीर जखमी केल्यानंतर काही वेळातच लटारु खेवले यांच्या बैलाला ठार केले.

  •  

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,

ब्रम्हपुरी दी, १७ सप्टेंबर : पुन्हा एकदा वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच वाघाने एका बैलावर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आवळगाव पासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या आवळगाव ते हळदा या रोडवर घडली आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव गंगाराम जयराम तिवाडे (४०) असून रा.आवळगाव येथील रहिवासी आहेत. तर दुसरीकडे त्याच गावातील लटारु खवले यांच्या मालकीच्या बैलावर त्याच ठिकाणी वाघाने हल्ला करून ठार केले आहे.

सदर वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेले शेतकरी हे आपल्याच घरच्याच गायी ,म्हशी व बैल चारत असताना मुख्य रोडलगत असलेल्या झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने गुरांना सोडून अचानक थेट शेतकऱ्यावर हल्ला करून ओढत नेत असताना शेतकरी गंगाराम ने जोरजोरात आरडाओरड केल्याने रोडच्या दुसऱ्या बाजूला गुरे चारीत असलेल्याना आवाज जाताच त्यांनी लाठीकाठीसह शेतकऱ्यांच्या मदतीला शेतकरी, गुराखी व कोशाचे रान करणारे रानकरी मदतीसाठी धावुन आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यावेळी वाघाने नागरिकांची आरडाओरड बघून शेतकरी गंगारामला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. लगेच रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थली असलेल्या नागरिकांनी  गावात  आणून सदर झालेल्या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.

त्यावेळी वनविभागाचे आवळगाँवचे क्षेत्र सहाय्यक करंडे हे उपस्थित होवून लगेच उपचारासाठी आरमोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असुन शेतकरी गंगारामच्या डोक्याला आणि पाठीवरती वाघाची नखे खोलवर रुतलेल्याने ते गंभीर जखमी झाले असल्याने उपचार सुरु करण्यात आला आहे . 

तर काही वेळातच त्याच पट्टेदार वाघाने जखमी केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच ठिकाणी लटारु खेवले यांच्या बैलावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याने ऐन हंगामाच्या  वेलीच शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असुन नागरिकांत नरभक्षक वाघाची मोठी दहशत निर्माण झाली असल्याने वन विभागाने वेळीच लक्ष घालून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा. याशिवाय जखमी झालेल्या शेतकऱ्याला व लटारू खेवले यांच्या मालकीच्या ठार केल्याने उपासमारीची वेळ आली आहे म्हणून शासनाने तात्काळ मदत करण्यात यावी.

गांगलवाडी ते चिचगाव, डोरली, वांद्रा, आवळगाव, हळदा ,बोडदा, कोसंबी, भुज,एकारा परिसरात नेहमीच वाघाचे हल्ले होत असतात. कोणी इसम वाघाच्या हल्ल्यात ठार होतो तर कोणाला कायमचे अपंगत्व येते.
या परिसरातील वाघाला रक्ताची चटक लागलेली आहे अशा नरभक्षी वाघांना जेरबंद करून कायमचे हद्दपार करावे .अशी या परिसरातील जनतेची मागणी जोर धरू लागली आहे.

हे देखील वाचा,

‘सर्वोत्कृष्ट पोलीस घटक’ दोन पुरस्कार गडचिरोली पोलीस दलास जाहिर

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील महीला शेतकऱ्यांकरीता “ भाजीपाला लागवड ” प्रशिक्षण मेळावा आयोजित

Comments are closed.