Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सणासुदीच्या काळात निर्भेळ आणि सकस अन्न पदार्थ मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग घेणार विशेष खबरदारी

जनतेने जागृकतेने सण साजरा करावा - डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन‍

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क दि. ३ नोव्हेंबर :दिवाळी सणाच्या कालावधीत पॅकिंग फुड, खवा, मावा,मिठाई व इतर अन्न पदार्थामधील भेसळ रोखण्याच्या दृष्टीने विशेष मोहिमा आखून नागरीकांना निर्भेळ व सकस पॅकिंग फुड, खवा, मावा व इतर अन्न पदार्थ मिळावेत याची खबरदारी अन्न व औषध प्रशासन विभागा मार्फत घेतली जात आहे. मात्र जनतेनेही मिठाई खरेदी करताना त्यावर Best Before ची तारीख नमूद आहे किंवा कसे याबाबत खात्री करूनच मिठाई खरेदी करावी, असे आवाहन अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

प्रशासनामार्फत निय‍मितपणे दरवर्षी गणेशोत्सव, दसरा, दिवाळी इत्यादी सणांच्या काळात खाद्यतेल, खवा, तयार मिठाई, मिठाईसाठी लागणारे कच्चे अन्न पदार्थ यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे या अन्नपदार्थांचे उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते आस्थापनांची सखोल तपासणी करून अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येतात. विश्लेषण अहवालात नमुद उल्लघनांनुसार कायद्यातील तरतुदीच्या अनुषांगाने कारवाई केली जाते. अन्न पदार्थांची गुणवत्ता अबाधित राहावी याकरिता तसेच अन्न पदार्थांच्या भेसळीस आळा बसावा व नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री थांबविण्याबाबत अन्न व औषध प्रशासन करित असलेल्या उपाययोजनांची माहिती डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सणासुदीच्या कालावधीत जन जागृती
• ग्राहकांना व अन्न व्यावसायिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थांबाबत जागृती करण्यासाठी शिबिरे आयोजित करण्यात येतात.
• अन्न पदार्थांत भेसळीस आळा घालण्यासाठी प्रशासनामार्फत राज्यभरात अन्न पदार्थ उत्पादक, वितरक, किरकोळ विक्रेते यांच्या नियमित तपासण्या करून नमुने घेण्याची कार्यवाही निरंतर केली जाते .
• सणासुदीच्या काळात विशेष मोहिमा आखून नागरीकांना र्निभेळ व सकस मिठाई, दुध, खवा, मावा, खादयतेल इ. अन्न पदार्थथ मिळावेत याची खबरदारी घेतली जाते.
• दुध व दुग्धजन्य पदार्थांबाबत जकातनाका मोहिम, झोपडपटटी मोहिम आखून अचानकपणे धाडी टाकून कारवाई केली जाते.

मिठाई बाबत
• Date of manufacturing and Best before date बाबत अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार दि. १ ऑक्टोबर २०२० पासून विना आवेष्टित /खुल्या स्वरूपातील मिठाई ज्या / ट्रे सारख्या भांड्यात विक्रीसाठी ठेवली आहे त्यावर best before तारीख नमूद करणे बंधनकारक असेल. अन्न व्यवसायिक हे या बाबी स्थानिक भाषेत नमूद करु शकतात असे स्पष्ट केले आहे.
• मिठाई उत्पादकांना याबाबत वेळोवेळी बैठका घेऊन तसेच तपासणीवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. जनतेने मिठाई खरेदी करताना त्यावर Best Before ची तारीख नमूद आहे किंवा कसे याबाबत खात्री करूनच मिठाई खरेदी करावी. बेस्ट Best Before निघून गेलेली मिठाई खरेदी करू नये तसेच खरेदी केलेली मिठाई Best Before तारखे आधीच खाण्यात यावी. त्यानंतर ही मिठाई खाऊ नये. जेणेकरून विषबाधा सारख्या घटना आपल्याला रोखता येतील.
• मिठाई खरेदी करून आणल्यानांतर मिठाईच्या STORAGE CONDITION नुसार साठवणूक करावी. बंगाली व तत्सम मिठाई यांना फ्रीज मध्ये साठवून ८ ते १० तासांच्या आतच खावी. वास, रंग व चव पाहून मिठाई ताजी असल्याची खात्री करावी.
• मिठाई खरेदी करताना शक्यतो नैसर्गिक खाद्य रंग वापरण्यात आलेली मिठाई विकत घ्यावी. ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता, कृत्रिम खाद्यरंग वापरून मिठाई तयार करण्यात येतात. कृत्रिम रंगाचे प्रमाण जास्त असलेल्या मिठाई खाण्याने कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात. त्याकरिता अशा भडक रंगीत मिठाई खाणे टाळावे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नोंदणी प्रमाणपत्र घेऊनच व्यवसाय करावा
• दिवाळीच्या काळात काही विनापरवाना आस्‍थापनाद्वारे चॉकलेट्स, दिवाळीचे फराळ इत्यादी तयार करून दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येतात. अन्न पदार्थांच्या पॅकेट वर कोणत्याही प्रकारचे लेबल नसते. अश्या विनापरवाना आस्थापनांनी अन्न व्यवसाय करणेपूवी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत परवाना / नोंदणी प्रमाणपत्र घेऊनच व्यवसाय करावा व नियमानुसार अन्न पदार्थांच्या पॅकेटवर लेबल लावावे. जनतेने असे विना लेबेलचे खाद्य पदार्थ खरेदी करणे व खाणे टाळावे.
• ग्राहकांनी पॅकींग किंवा सीलबंद अन्न पदार्थ खरेदी करताना सदर अन्न पदार्थांच्या लेबलवर अन्न पदार्थाचे नाव, घटक पदार्थ, nutritional information, वेज -नॉन वेज लोगो, additives, उत्पादकाचे पूर्ण नाव व पत्ता, वजन, लॉट नं., उत्पादन दिनांक/ पॅकिग दिनांक, Best Before दिनांक / use by date, fssai परवाना /नोंदणी क्रमांक इ . माहिती नमूद असल्याची खात्री करूनच अन्न पदार्थ खरेदी करावीत.
• मिठाई पॅक बंद किवा सीलबंद अन्न पदार्थ, कच्चे अन्न पदार्थ इत्यादी नोंदणी धारक/ परवाना धारक आस्थापनेतूनच खरेदी करावीत. मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना ते शिळे नसल्याचे खात्री करूनच खरेदी करावीत व विक्रेत्यांकडून त्याबाबत खरेदी बिल घ्यावे. फेरीवाल्यांकडून खवा, मिठाई घेणे टाळावे. शक्यतो उघड्या वरील अन्न पदार्थ खाणे टाळावे.

तक्रार असेल तर संपर्क करा
• राज्यातील नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवनात अन्न पदार्थाबाबत घडलेल्या घटना तसेच अन्न पदार्थाच्या गुणवते संदर्भात जागरूक राहावे तसेच त्यांच्या तक्रारी प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. राज्यातील नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या fssai.gov.in या संकेतस्थळावर Grievance portal वर अतिशय सहज व सोप्या पद्धतीने online तक्रार नोंदवू शकतात. प्राधिकरणाच्या संकेतस्थळाबाबतची माहिती जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचावी म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे.
• प्रशासनाचे मुंबई येथील मुख्यालयात 24×7 चे अवलंबन करून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. दूरध्वनी क्रमांक 022-26592364/65, 26592373/1820 व फॅक्स नं. 26591959 व ई-मेल – [email protected][email protected] हे आहेत. टोल फ्री क्रमांक 1800222365 हा पण 24×7 च्या धर्तीवर कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तसेच नागरीक प्रशासनातील सर्व जिल्हा कार्यालयात दुरध्वनीव्दारे किंवा ईमेलव्दारे तसेच लेखी निवेदनाव्दारे संपर्क साधुन भेसळयुक्त पदार्थांबाबत तक्रार नोंदवू शकतात. प्रशासनामार्फत तक्रारीची त्वरीत दाखल घेण्यात येईल.3

हे देखील वाचा :

बेस्ट आर्टीस्ट पुरस्काराने मोनिका भडके सन्मानित

पालघरमध्ये विवाहित महिलेची निर्घुण हत्या!

Comments are closed.