मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका.. खडे बोल सुनावत मागणी फेटाळली..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात
आलेल्या तक्रीरी महाराष्ट्राबाहेर स्वतंत्र यंत्रणांमार्फत करावी, अशी मागणी करणारी याचिका केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या मागणीवर परमबीर सिंह यांना खडे बोल सुनावत त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्यसरकारला मोठा दिलासा मिळाला असल्याचे मानले जात आहे.
खडे बोल सुनावत मागणी फेटाळली..
परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले आहे. “तुम्ही ३० वर्षे ज्या पोलीस दलात काम करत आहात, तुम्ही महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची मागणी करून त्या पोलिस दलाबाबत अविश्वास कसा दाखवू शकता..? . तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात. तुम्हाला आता तुमच्या राज्यावर विश्वास राहिला नाही का ? असे म्हणत तुमची मागणी धक्कादायक असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला देत न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांनी परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
परमबीर सिंह यांच्या बाजूने वरिष्ठ वकिल महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केला.
हे देखील वाचा :
धक्कादायक! लग्नासाठी गेलेल्या जावयाच्या अंगावर ओतले पेट्रोल अन् दिले जाळून
Comments are closed.