Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्रिय मंत्री भुपेंद्र यादव यांची गोंडवाना विद्यापीठाला सदिच्छा भेट

मिशन लाईफ मध्ये सहभागी होऊन आपण जागतिक हवामान कृतीत योगदान द्यावे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 23 जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला मिशन लाइफ चा नारा दिला आहे . मिशन लाईफ ही भारताच्या नेतृत्वाखालील जागतिक जन चळवळ आहे. जे पर्यावरणाचे रक्षण आणि जतन करण्यासाठी वैयक्तिक तसेच सामुदायिक कृतीला प्रोत्साहन देते .मिशन लाईफ मध्ये सामील होऊन आपण जागतिक हवामान कृतीत योगदान देऊ शकतो तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून मातृभाषेतून शिक्षण घ्यायला हवे असे आवाहनही केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी केले.

केंद्रीय कामगार व स्वयंरोजगार आणि पर्यावरण वन व हवामान बदल मंत्री भारत सरकार भूपेंद्र यादव यांनी आज गोंडवाना विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरूश्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन , अधिष्ठाता मानव विज्ञान केंद्र डॉ.चंद्रमौली, नव संशोधन केंद्राचे संचालक मनीष उत्तरवार, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपवनसंरक्षक निलेश शर्मा तसेच प्रशासनाचे इतर अधिकारी,अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रममधील वनवासी हितरक्षाचे प्रमुख गिरीश कुबेर , सृष्टी संस्थेचे संचालक केशव गुरनुले , प्राध्यापक रुपेंद्र गौर ,ग्रामसभेचे सदस्य आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सामाजिक दायित्वातून गौणवन उपजाच्या क्रिया कलापांशी ग्रामसभा क्षमता सक्षमीकरण व प्रशिक्षण केंद्र गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ एप्रिल २०२२ पासून सुरू झाले आहे. स्थानिकांनी कोणत्या गोष्टी संकलन आणि साठवणूक करून त्याच्या विक्रीत प्रावीण्य कसे मिळवता येईल ,पेसा कायदा म्हणजे, काय जैवविविधता, मनरेगा अशा सगळ्या गोष्टी ग्रामस्थांना अवगत होण्यासाठी हा प्रकल्प सुरू असल्याचे त्यांनी सांगितले तसेच विद्यापीठ आपल्या गावात या उपक्रमाविषयी त्यांनी मंत्री महोदयांना अवगत करून दिले.

यावेळी मंत्री महोदयांनी काही उपक्रमांचे कौतुक करून विद्यापीठाच्या विद्यापीठाला शुभेच्छा दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमा मधील वनवासी हित रक्षाचे प्रमुख गिरीश कुबेर यांनी ग्रामसभांनी एकत्र येऊन काम करणे महत्त्वाचे आहे विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला एकल प्रकल्प देशासाठी मॉडेल आहे.
तसेच त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाचे स्वरूप स्पष्ट केले.

यावेळी ग्रामसभेच्या सदस्यांनी
ज्या लोकांना सामूहिक वन हक्क प्राप्त झालेले आहे. अशा वनभूमीचे सीमांकन करणे, शासन दरबारी नोंद होणे, वनविभागाचे निधी ग्रामसभांना सरळ देता येईल यासाठी कारवाई करणे या मागण्यांचे निवेदन सादर केले तसेच सृष्टी संस्था आणि दिनबंधू समाज विकास संस्था देवरी यांनी मागण्यांचे निवेदन यावेळी सादर केले . या बैठकीचे संचालन आणि आभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी मानले.

हे पण वाचा :-

Comments are closed.