मुंबईची तुंबई का झाली; नालेसफाईत मोठा भ्रष्टाचार
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची चौकशीची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 9 जुलै – तीन दिवसाचा मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली. नालेसफाई न केल्याने पाणी रेल्वे स्टेशन आणि रस्त्यावर साचले. नागरिकांचे प्रचंड हाल झाले. निवडणुका न झाल्याने आता मुंबईत लोकप्रतिनिधी नाहीत. त्याचा फटका बसला आहे.याचा अर्थ नालेसफाईसाठी खर्च केलेले शेकडो कोटी रूपये पाण्यात गेले आहे. याप्रकरणाची शासनाने उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगनच्या माध्यमातून विधानसभेत केली आहे.
Comments are closed.