Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सत्याग्रहातून करणार काँग्रेस कृषी विधेयकाला विरोध.कृषी विधेयकाच्या विरोधात काँग्रेस सत्याग्रहासाठी सज्ज …

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

वर्धा दि ३० ऑक्टो –  केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या सत्याग्रह या अस्त्राचा आता आधार घेतला आहे. काँग्रेसने राज्यव्यापी सत्याग्रहाची तयारी चालविली असून सेवाग्राम येथील बापू कुटीच्या समोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. शनिवारी ३१ आक्टोबर रोजी हे सत्याग्रह आंदोलन होत आहे. काँग्रेसने यासाठी जय्यत तयारी केली आहे. सेवाग्राम आश्रमसमोर पेंडाल टाकण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या आंदोलनात काँग्रेसमधील दिग्गज सहभागी होणार आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रभारी एच एन पाटील, यशोमती ठाकूर वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार सहभागी होणार आहे. सकाळी ११ ते ४ दरम्यान होणाऱ्या या सत्याग्रह आंदोलनात काही शेतकरी देखील सहभागी होणार आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.