Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एटापल्ली तालुक्यात दारूमुक्त निवडणुकीसाठी ४५ गावे सरसावली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

एटापल्ली, दि. १५ जानेवारी: गाव विकासासाठी दारूमुक्त निवडणूक गरजेची आहे. यासाठी एटापल्ली तालुक्यातील ४५ गावांनी पुढाकार घेत ‘ग्रामपंचायत निवडणूक-दारूमुक्त निवडणूक’ करण्याचा ठराव घेतला आहे. निवडणुकी दरम्यान उमेदवारांना दारूचे वाटप करू देणार नाही, नशेत मतदान करणार नाही. असा निर्धारही या गावांनी केला आहे. यामुळे योग्य उमेदवाराची निवड करून ग्राम विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.

विधानसभा व लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाची ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्यासाठी गावागावात ठराव घेऊन प्रयत्न केल्या जात आहे. निवडणुकी दरम्यान दारूचे वाटप होण्याची शक्यता असते. यावर नियंत्रण ठेवत दारूमुक्त निवडणूक करण्यासाठी आतापर्यंत तालुक्यातील ४५ गावांनी ठराव घेतला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आलदांडी, पंदेलवाही, करेम, घोटसुर, गुंडम, टाळीगुडम, येमली, कांदळी, मुसारामगुंडा, वेनसर, तुमरगुंडा, तुमरगुंडा बु, बरसेवाडा, पंदेवाही, मंगर, हेड्री, इटालणार, परसलगोंदी, डुमे, बांडे, पर्सलगोंदी स, सुरजागड, जवेली, उडेरा, बुर्गी, पुन्नूर, वाघेझरी, वाघेझरी म, जवेली खु, जिजावंडी, बुर्गी स, कोटाकोंडा बु, सोहगाव, मांझीगड, वांडोली, सिनभट्टी, भापडा, तांबडा स, तांबडा म, ताडपल्ली अ, कोंदावाही म, पैमा, गेदा, चंदनवेली, गुरुपल्ली ही गावे दारूमुक्त निवडणुकीसाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच ग्रामपंचायत निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांकडून ‘दारूचे वाटप करणार नाही’ असा वचननामा देखील लिहून घेण्यात आलेला आहे.       

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.