वर्ध्याच्या सत्याग्रही घाटात द बर्निंग कार, चिमुकल्या सह तिघांचे जीव वाचले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा, दि. १० एप्रिल: वर्धा जिल्ह्यातील तळेगांव शामजीपंत या गावातील सत्याग्रही घाटात एक कार जाळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. MH 33 व 0950 क्रमांकाची कार भंडारा येथून अमरावती च्या दिशेने जात असताना तळेगांव येथील घाटात या कार ने पेट घेतल्याने कारचा कोळसा झाला आहे.
या कारमध्ये एका दहा महिन्याच्या चिमुकल्यासह तिघे जण प्रवास करत होते, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही पण गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Comments are closed.