Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंतप्रधान मोदी, शाहंची आकडेवारी फसली, बंगालच्या जनतेने भाजपाला नाकारलं : मंत्री नवाब मलिक

Get real time updates directly on you device, subscribe now.

बंगालच्या जनतेने भाजपाला नाकारलंय आता अमित शाहंनी राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गोंदिया, दि. २ मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंची आकडेवारी फसली, बंगालच्या जनतेने भाजपला नाकारलं आहे. आतातरी अमित शाहंनी राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगाल निकालावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे कल हाती आले असून ममता बॅनर्जी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होताना दिसत आहेत. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मंत्री नवाब मलिक म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन वर्षांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आभास निर्माण करून नेहमीच आकडे फेकून ‘अबकी बार दो सौ के पार’ असे राजकारण करत होते. याचे उत्तर त्यांनी दिले पाहीजे. देशात जी परीस्थिती कोविडच्या बाबतीत निर्माण झाली आहे. ज्याची जबाबदारी स्विकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहंनी राजीनामा द्यावा, असं ममता दिदींनी म्हटलं होत. मात्र, अमित शाहंनी जेव्हा बंगालची जनता आम्हाला नाकारेल, तेव्हाच राजीनामा देऊ असं म्हटल होत. तेव्हा आता बंगालच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागीतला आहे. त्यामुळे अमित शाहंनी आतातरी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गोंदियात केली आहे. 

तर पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या चुका राष्ट्रवादी दुरूस्त करण्याचा प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ममता बॅनर्जींच्या विजयावर शिक्कामोर्तब
देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमुलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांनी १२०० मतांनी विजय मिळवला आहे. 

पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या कलावरून सध्या तृणमूल काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असंच दिसतंय. पण नंदीग्राममध्ये मात्र सुरुवातीपासूनच अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. सुरुवातीला भाजपच्या शुभेन्दु अधिकारी यांनी ममतांना पिछाडीवर टाकत मोठी आघाडी घेतली होती. नंतर काही वेळाने ममता दीदींनी पुन्हा कम बॅक करत २७०० मतांची आघाडी घेतली. पण ही आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही. नंतर लगेचच शुभेन्दु अधिकारी पुन्हा एकदा आघाडीवर गेले. नंदीग्राममधील मतमोजणीमुळे क्षणाक्षणाला अनेकांचा काळजाचा ठोका चुकत होता. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.