Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली सी -६० पोलीस जवानांचा गृहमंत्र्याच्या हस्ते गौरव , मर्दनटोला येथिल कामगिरीचे केले कौतुक.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली १५ नोव्हेंबर :- धानोरा तालुक्यात येत असलेल्या ग्यारापत्ती मर्दिनटोला छत्तीसगड सीमेलगत जंगल परिसरात शनिवारी दि,१३ नोव्हेंबर रोजी सी-६० पोलिस जवानांनी शनिवारी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकित २६ नक्षलयांचा खात्मा केला आहे.

त्या सी-६० बहादूर जवानांचा गौरव करण्यासाठी गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे प्रत्यक्षरीत्या हजर होऊन जवानांचे मनोबल वाढवुन जवानांच्या कामाची स्तुती करीत नक्षल विरोधी अभियानातील पोलीस अधिकारी तथा सी ६० पोलीस जवानांना शुभेच्छा व प्रशस्तीपत्र देऊन महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सत्कार करून पोलीस जवानांचा कौतुक करीत पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला मानवंदना दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित भूषणकुमार उपाध्याय अतिरिक्त पोलीस महासंचालक,छेरिंग दोरजे पोलीस महानिरीक्षक( नक्षल विरोधी अभियान)संदीप पाटील पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अंकित गोयल पोलीस अधीक्षक गडचिरोली , सोमय मुंडे, समीर शेख अपर पोलीस अधीक्षक गडचिरोलीसह अधिकारी ,कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

ग्यारापत्ती मर्दिनटोला जंगल परिसरात झालेल्या चकमकीत माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेल्या मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवाद्यांना खात्मा केला . नक्षलविरोधी पोलीस तुकड्यांचे कमांडर व सी-६० जवानांचा सत्कार व ऑपरेशन हेड असलेले अतिरिक्त पोलीस अधिक्षक सोमय मुंडे व पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांचा महाराष्ट्र शासनाकडून गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले की गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी युवकांना आगामी पोलीस भरती मध्ये प्राधान्य देऊ तसेच सी-६० जवानांच्या या कामगिरीचे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता सी-६० जवानांनी नक्षलवाद्यांच्या मोठ्या कॅडरला कंठस्नान घालण्यात यश मिळविले आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे.त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला विकास हवा आहे.त्यामुळे नक्षलवाद्यांनी बंदुका खाली ठेवून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

हे देखील वाचा,

अमरावती शहरात संचारबंदी आदेश लागू

मोठी बातमी: गडचिरोली पोलिसांना मोठे यश; पोलीस-नक्षल चकमकीत २६ नक्षल्यांचा खात्मा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.