Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

….आणि तिने चक्क रस्ताच्या विरोधातच दाखल केली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

औरंगाबाद:७डिसेंबर

राज्यातील अनेक ठिकाणचे रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत. त्यातूनच अनेक चाकरमान्यांना प्रवास करीत आपल्या इच्छित स्थळी पोहोचायला वेळ लागतो.पोलीस स्टेशन मध्ये आपण अनेक किरकोळ वाद,मारहाण,चोरी,खून ,बलात्कार इंत्यादी तत्सम गुन्हांची तक्रार होताना बघितले असेल मात्र औरंगाबाद च्या एका महिलेने चक्क  खराब रस्ता च्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आपण अनेक तक्रारीचे प्रकार पाहिले असतील, परंतु कोणी रस्त्याच्या विरोधात तक्रार केल्याचे ऐकिवात नसेल. पण औरंगाबादेत अशीच एक तक्रार झाली आणि तीही एका महिलेने केली आहे. औरंगाबाद शहरात राहणाऱ्या संध्या घोळवे-मुंडे यांनी चक्क रस्त्याविरोधात पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे.  

संध्या मुंडे या फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करतात. गेल्या 14 वर्षांपासून त्या औरंगाबाद ते फुलंब्री रस्त्यांने अप-डाऊन करतात. त्यामुळे त्या रस्त्याच्या प्रवासाला कंटाळल्या आहेत. औरंगाबाद ते फुलंब्री हा तीस किलोमीटरचा रस्ता. गेल्या तीन वर्षांपासून औरंगाबाद जळगाव रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे असंख्य त्रासांना त्यांना सामोरं जावं लागतं आहे. याच कामाचा कंत्राटदार काम सोडून गेला. रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने तब्बल एक वर्ष नागरिकांचे हाल सुरू होते. संध्या मुंडे तर गेल्या 14 वर्षांपासून या रस्त्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळलेल्या आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कंटाळलेल्या संध्या मुंडे यांनी वैतागून थेट फुलंब्री पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी औरंगाबाद- फुलंब्री या रस्त्याविरोधातच पोलिसात तक्रार केली आहे. ‘हा रस्ता मला मानसिक, शारीरिक , आर्थिक त्रास व्हावा या हेतूने धक्काबुक्की आणि अडवणूक करीत आहे. हा रस्ता सुधारेल अशी मला अशा होती. मात्र तसे न होता हा रस्ता दिवसेंदिवस प्राणघातक बनत चालला आहे,’ असं त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.