Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिल्लीतील किसान आंदोलनात सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य किसान सभेची टीम रवाना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी, ३ जानेवारी :- दिल्ली-यूपी बॉर्डरवर 26 नोव्हेंबर 2020 भारतील अनेक शेतकरी ३७ दिवसापासून किसान बिल चा विरोधात आंदोलन करत आहे. संध्या थंडी आणि पाऊसात पण सिंधू बॉर्डरवर आंदोलन सुरु ठेवला आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या त्यात सहभाग होण्यासाठी आज ३ जानेवारी ला आरमोरी येथून रवाना झाले आहे.

भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने शेतकरी विरोधात पारित करण्यात आलेले तीन विधेयक मागे घेण्यात यावे व शेतकऱ्यांच्या इतरही मागण्यासाठी दिल्ली येथे 26 नोव्हेंबर 2020 पासून महा आंदोलन सुरूआहे परंतु सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने या आंदोलनात सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो गाड्यातू न हजारो शेतकऱ्यांचा जत्ता 3 जानेवारी 2021 रोजी नागपूर येथून 4 वाजता दिल्ली कडे रवाना होणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी व कार्यकर्त्याची टीम आरमोरी येथून 12 वाजता रवाना झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या टीमचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य कॉ. ड्रा. महेश कोपुलवार, भाकप चे जिल्हा सचिव कॉ. देवराव चवळे, सहसचिव कॉ. अँड जगदीश मेश्राम, आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे, भाकप आरमोरी शहर प्रमुख कॉ.संजय वाकडे, लाल बावटा शेतमजूर युनियन चे जिल्हा सचिव कॉ. चंद्रभान मेश्राम, ऋषी दाऊ वार, प्रकाश ठलाल, केवलराम नागोसे, ललित गेडाम, मिलिंद खेवले, पूनाजी मांडवे, सुनील सयाम करणार आहेत.

Comments are closed.