Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऋतुजा लटके यांचा बीएमसी नोकरीचा राजीनामाची न्यायालयीन लढाई सुरू .

दुपारी अडीच नंतर निर्णय येणार !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 13,ऑक्टोबर :- ऋतुजा लटके यांचा राजीनामा बीएमसी कडून स्वीकारला गेलेला नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर त्यांची उमेदवारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. यामुळे ऋतुजा लटके यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आज या याचिकेवर सुनावणी होत आहे. बीएमसी आणि ऋतुजा लटके यांच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायलयाने बीएमसीला आपला निर्णय कळवण्याकरता अडीच वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे.

लटके यांच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडताना असे म्हटले आहे की, पहिल्या पत्रात ऋतुजा लटके यांनी राजीनामा कारण स्पष्ट केलं होतं. दुसऱ्या पत्रात इतर फॉर्मलिटी स्पष्ट केल्या निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा अट शिथिल करावी ही मागणी योग्य. राजकीय चळवळीत भाग घ्यायचा असेल तर राजीनामा देणं आवश्यक

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

क्लार्क पोस्ट ही थेट कमिशनर यांच्याकडे मंजुरीसाठी जाण्याचं कारणच काय ? ही पोस्ट इतकी महत्वाची नाही. नियमानुसार पालिका कोषागारात पगार रक्कम भरली.
-१ महिना नोटीस कालावधी पूर्ण होत असतानाही १ महिना पगार रक्कम भरणं आवश्यक. राजीनामा कारण पहिल्या पत्रात स्पष्ट केलं होतं
१ महिना नोटीस कालावधी हा कर्मचाऱ्याच्या हिताचा मानला जातो, जर त्याचं मत बदललं तर त्याला राजीनामा मागे घेता यावा म्हणून हा कालावधी असतो
१ महिन्याचा कालावधी टाळण्यासाठी नियमाने आवश्यक रक्कम भरली होती . मात्र तुमचा राजानाम्याचा अर्ज पालिका आयुक्तांकडे प्रलंबित असल्याचं सांगत तो मंजूर झालेला नाही. मुळात या पदावरील कर्मचा-याचा राजीनामा आयुक्तांपर्यंत जातच नाही तो सहआयुक्त स्तरावरच पास केला जातो . मात्र राजकीय दबावापोटीच तो थांबवण्यात आला.

बीएमसी चे वकील यांनी असा युक्तिवाद केला की,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लटके यांनी सादर केलेला राजीनामा योग्य स्वरूपात नाही त्यावर रितसर निर्णय देण्यास वेळ लागणं स्वाभाविक आहे केवळ एका महिन्याचा पगार जमा केला, म्हणून राजीनामा तातडीनं स्वीकारावा अशी मागणी करणं चुकीचं , दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टानं बीएमसी वकिलांना असा प्रश्न केला की, एखाद्या कर्मचाऱ्याला जर निवडणूक लढवायची आहे तर त्यात तुम्हाला अडचण काय? कोर्टाने बीएमसी वकिलांना म्हटलं की, तुम्ही निर्णय घेणार आहात की नाही ते कळवा. बीएमसी प्रशासनासोबत चर्चा करून तुमचा निर्णय कळवा. त्यानंतर आम्ही तुमची बाजू ऐकू. बीएमसी वकिलांना कोर्टानं दुपारी अडीचपर्यंतची वेळ दिली आहे.

हे देखील वाचा :-

१३ जणांचा बळी घेणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद..

 

Comments are closed.