केंद्रात आणि राज्यात सत्ता असून देखील परळी ला साधा वळण रस्ता आणू शकल्या नाहीत; मंत्री धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बीड : केंद्रात आणि राज्यात सत्ता असून देखील परळी शहरासाठी साधा वळण रस्ता सुद्धा अनु शकल्या नाहीत अशी टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे आज परळी बायपास चे उद्घाटन करण्यात आलं परळी परिसरातील अनेक नागरिकांची परळीला बायपास रस्ता असावा अशी मागणी होती तत्कालीन सरकार मध्ये पाच वर्ष असताना देखील त्यांना हे करता आले नाही आमदार झाल्या झाल्या मी सात महिन्यात या रस्त्याला मंजुरी आणली आणि 78 कोटी रुपये यावर खर्च होणार आहे याचा मला आनंद असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आज परळी बायपास रस्त्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी भूमिपूजन केले
राज्यभरात दोन दिवस होणाऱ्या अधिवेशना अगोदर अध्यक्षपद निवडीवरून चर्चा सुरू असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहील यावरील वायफळ चर्चा बंद कराव्यात असं मत व्यक्त केलंय.
हे देखील वाचा :
४ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, …विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक
Comments are closed.