पवारांनी पावसात भिजून सरकार आणले आता जनतेचा घाम काढत आहेत
पवार म्हणतात पावसात भिजले म्हणून सरकार आले आणि आता हेच सरकार लोडशेडिंग करून जनतेचा घाम काढते आहे - माजी कृषी मंत्री अनिल बोडे यांची शरद पवारांवर टीका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वर्धा, दि. १५ एप्रिल : वर्ध्याच्या आर्वी मतदार संघात शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मोठ्या संख्येने झालेला पक्षप्रवेश हा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. आर्वीचे आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झालाय. यावेळी बोलताना माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
शरद पवार म्हणतात पावसात भिजले म्हणून सरकार आले आणि आता हेच सरकार लोडशेडिंग करून जनतेचा घाम काढते आहे, जनतेचा घाम काढणारे हे सरकार आहे. लोडशेडिंग करून शेतकऱयांच्या समस्या हे सरकार वाढवत असल्याची टीका यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी आमदार अशोक उईके, आमदार रामदास आंबटकर, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट उपस्थित होते.
हे देखील वाचा :
भीषण अपघात : कार अपघातात सासू-सुनेचा जागीच मृत्यू सहाजण गंभीर जखमी
वाघाच्या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी; वाघ बघायला जाणे बेतले जीवावर
Comments are closed.