Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार !

ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील शेत शिवारातील घटना...

अमरदीप लोखंडे,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मृतक शेतकरी तूळशीराम सुकरु कांबळी यांची वाघाशी दोन हात करणारा आणि प्रसंगी  पिटाळून लावणारा अशी गावात ओळख होती .मात्र  शेवटी तोच वाघाचा बळी ठरला हे विशेष…

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ब्रम्हपुरी दि,१७ एप्रिल :आवळगाव येथील वाघाच्या हल्यात दि, १६ एप्रिल  रोज शनिवारला सायंकाळी अंदाजे चार ते पाचच्या  दरम्यान तूळशीराम सुकरु कांबळी (६७)  हे आपल्या दैनदिनप्रमाणे शेतामध्ये उन्हाळी धान व मिरची च्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाऊन वाकून पाणी देत असतांना आधीच शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घातली आणि त्या झडपेत काही कळण्याआधीच  शेतकरी तुलसीराम कांबळी हे गतप्राण झाले.

त्यानंतर वाघाने  मृतक शेतकऱ्याला  मिरचीच्या शेतातून जवळपास २०० ते ३०० मीटर ओढत वैनगंगा नदी किनारी घनदाट गवतात नेऊन ठेवले .
सदर मृतक शेतकरी हा काही तासाआधी आपल्या मुलीच्या सासरी  तेलीमेंढा या गावावरुन भेट घेऊन स्व – गावी आला आणि लगेच शेतावर निघून गेला आणि वाघाचा बळी ठरल्याने गावात एकच शोककुळ वातावरण निर्माण झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

घटनेची माहिती वनविभागा ला माहिती होताच पंचनामा करून  मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी येथे रात्रिच हलविण्यात आले. या वेळी घटनास्थळी ब्रह्मपुरी चे ठाणेदार आपल्या ताफ्यासह उपस्थित होते..

सदर मृतक व्यक्तीवर हल्ला करण्या-अगोदर त्या नरभक्षक  वाघाने होमराज सातपुते यांच्या शेळीवर हल्ला करून जखमी केले होते. सकाळपासूनच बोधना घाटावरच्या रस्त्यावर वाघ ठाण मांडून बसलेला होता असे ह्या रस्त्यावरून जाणारे येणारे शेतकरी सांगत होते.

मृतक व्यक्तीला दोन मुले आणि एक मुलगी असून बराच मोठा आप्तपरिवार आहे. मृतकाच्या कुटुंबीयांच्या परिवाराला तात्पुरती आर्थिक मदत उपविभागीय वनाधिकारी, ब्रह्मपुरी  महेश चोपडे, आवळगाव चे वनक्षेत्र सहाय्यक  ए. पी. करंडे, वनरक्षक  एल. डी. सातपुते यांनी वीस हजार रुपये दिले.

जंगलाला लागलेल्या वणव्यामुळे जंगली पशु नदी किनारी वास्तव्यास आहेत. यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी रास्त मागणी या परिसरातील जनता वनविभागाला करीत आहे.

हे देखील पहा ,

ईडीची भिती दाखवणाऱ्या भाजपाला कोल्हापूरकरांनी जागा दाखवली !: नाना पटोले

धार्मिक तेढ निर्माण करण्याचा डाव उधळून लावा : भाई रामदास जराते

WCL ने कोळशाच्या शेत्रात आणखी उत्पादन वाढवावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Comments are closed.