एस.टी. कर्मचाऱ्यांचा तोडगा फक्त कॉग्रेस पक्षच काढू शकतो; कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गोंदिया, दि. १३ जानेवारी : राज्यात एस.टी. कर्मचाऱ्याचा विलगीकरणाच्या मुद्यावर संप सुरु असून कॉग्रेश प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले असून हे पत्र वायरल झाले होते. त्याबाबत त्यांनी आज गोंदिया मध्ये खुलासा केलेला आहे.
खुलासा देतांना नाना पटोले म्हणाले की, २० जानेवारीला २०२२ ला उच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या त्री सदशिय समितीची मुदत संपत असून सुद्धा या त्री सदशिय समितीने दिलेला अहवाल राज्याला सादर केला असून हा अहवाल एस टी महामंडळाला मान्य नसल्याने आणि त्यांचे वकील गुणवंत सदावर्ते हे वकिली पेक्षा राजकीय नेते जास्त आहेत आणि त्यांच्या सोबत भाजपचे नेते आंदोलनात राहतात आणि हेच भाजपचेच कारस्थान आहे. एस.टि. महामंळाच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजप राजकारण करीत आहे. त्यांच्या जीवनाची होळी करण्यास भाजपचे लोक लागले आहे . तुम्ही कामावर परत या असे आवाहन करीत तुमचा तोडगा फक्त कॉग्रेस पक्षच काढू शकतो. असे नाना पाटोले आपल्या वायरल झालेल्या पत्रावर खुलासा देताना गोंदियात म्हणाले.
हे देखील वाचा :
पोलीस कोठडीतील आरोपी मृत्यू प्रकरण; ठाणेदारासह दोन पोलिसांवर गुन्हे दाखल
“या” महिन्यात १० टक्क्यांपर्यंत वाढणार इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती
Comments are closed.