Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Loksparsh Exclusive : त्या…नरभक्षक वाघाने घेतला तीन वर्ष्यात अकरा जनांचा बळी, मानवी जीवितास धोका ठरलेल्या वाघाला जेरबंद करण्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)यांचे आदेश,

मागील 15 दिवसात तीन बळी घेतल्याने नागरीकात दहशत .. तीन वर्ष्यातील घटना बघता पुन्हा दुसरा वाघ नरभक्षक असल्याची शक्यता.. मानवी जिवितावर हल्ला करणारा वाघ दोन वर्ष्याचा असल्याचा प्राथमिक माहिती ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   

वडसा वनविभागा अंतर्गत असलेल्या पोर्ला वनपरिक्षेत्रात वारंवार वाघांचे हल्ले होत असलेला वाघ लावलेल्या  ट्रॅप  कॅमेरात कैद झाला असुन त्याच नरभक्षक वाघाचे पाऊलखुणाद्वारे ओळख निश्चित झाल्याने त्या संदर्भाचा अहवाल गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक (प्रादे.) डॉ. किशोर मानकर यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर सुनील लिमये यांना सादर केला होता. त्या अहवालाच्या अनुषंगाने मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांनी वाघाला जेरबंद करण्याचे आदेश काढले असून दिनांक  ३ सप्टेंबर २०२१ ला गडचिरोली वनवृत्त कार्यालयाला प्राप्त झाले आहे. त्याच नरभक्षक वाघाला वनविभागाकडून जेरबंद करण्याच्या हालचालींंना वेग आला आहे.

गडचिरोली ०४ सप्टेंबर : गडचिरोली वनवृत्तात असलेल्या गडचिरोली व वडसा वनविभागात मानव वन्यजीव संघर्ष निर्मांण झाल्याचे पहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील महिला,पुरुष ,घरगुती जलावु लाकुड़, सरपनासाठी तसेच शेतकरी, शेतमजूर, गुराखी गुरेढोरे चारायला गेलेल्या  ठिकाणी वाघ अचानकपणे हल्ला करुण जागीच ठार  करुण धुमाकूळ घातला असल्याने नागरिकात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे,

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आतापर्यंत  जिल्ह्यातील ११  नागरिकांचा बळी घेतल्याने कष्टकरी , सामान्यवर्ग दहशतीत आला असल्याने  शेतकरी आपल्या शेतात जाण्यास धजावत नाहीत  तर काही शेतकऱ्यांनी वाघाच्या दहशतीमुळे शेतकऱयांनी शेतीच केली नाही.

आधीच कोरोना संसर्गाने रोजगार हिरावला आहे तर दुसरीकडे वाघाच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा रोजगार मिळत नसल्याने उपासमारीची पाळी आली आहे. वाघाचे ही वारंवार  हल्ले करून शेतमजुरासह पाळीव जनावराचे फडशा फाडल्याने  जंगला शेजारी असलेल्या शेतकरी वर्ग  हवालदिल झाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या वाघाच्या संदर्भात वेळोवेळी गडचिरोली, वडसा वन विभागात तक्रार आणि नागरिकांनी निवेदन देवून वाघाचे बंदोबस्त करण्याची मागणी  १८ गावातील सरपंच पोलीस पाटील  इतर सदस्यांनी  केली आहे.

वडसा, गडचिरोली या  दोनही वनविभागातील अठरा गावातील नागरिक एकत्र येऊन आंदोलनाचा इशारा देऊन आंदोलन गडचिरोली वनवृत्त  कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे.

पोर्ला वनपरिक्षेत्रात वाघाची दहशत  निर्माण झाली आहे. निष्पाप नागरिकांचा  वाघ हल्ला  करुण  बळी घेत  असल्याने नागरिकांना मनस्ताप झाल्याने आंदोलन, करण्यासाठी निवेदन दिले ,त्याच तक्रारीची दखल घेऊन  गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ.  किशोर मानकर यांनी वाघाची दहशत, हल्ले लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी  सुनील लिमये , प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांना प्रस्ताव पाठवून जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

 

गडचिरोली जिल्ह्यात 20 वाघ असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला  आहे.  ज्या वाघांची दहशत पसरलेली आहे आणि त्याच वाघाच्या हल्ल्यात निष्पाप माणसाचा बळी घेत आहेत. त्या नरभक्षक वाघाची ओळख पटली असून तो नर जातीचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या वनवृत्तासमोर सुरु असलेले आंदोलन शिवाय लोकप्रतिनिधीने या मुद्दयाला लक्ष वेधले असल्याने वनविभाग वाघाला जेरबंद करण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालू आहेत. दोन दिवसात वाघाला जेरबंद करून दहशतीतून नागरिकांना मोकळा श्वास घेण्यास  मदत होईल अशी अपेक्षा आहे.

धर्मवीर सालविठ्ठल – उपवनसंरक्षक वडसा वनविभाग

 

वडसा वन विभागात वाघाला जेरबंद करण्यासाठी केले जात आहेत विविध उपाययोजना

  • पोर्ला वनपरिक्षेत्रात चुरमुरा नियतक्षेत्रात वाघाला जेरबंद करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत त्यामध्ये सुरुवातीला वाघाचा वावर असलेल्या ठिकाणी दोन पिंजरे लावन्यात आले आहे.वनविभागाने  वाघाला जेरबंद करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांची चार पथके निर्माण करण्यात आली असून त्यांच्यावर नियंत्रण करण्याची जबाबदारी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देण्यात आली आहे.
  •  वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यामध्ये दोन बकरे ठेवण्यात आली असून त्याला बकऱ्याला  भक्षण करताना जेरबंद करण्याचे योजना सफल झाली तर दोनच दिवसात यशस्वी  मोहीम होणार आहे तर दुसरीकडे दोन दिवसात वाघाला जेरबंद करण्यात उशीर झाल्यास पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली नेमबाज यांच्याकडून बेशुद्ध करण्यात येणार आहे.
  • वडसा वनविभागात एकूण 134 युवकांची पी आर टी म्हणून  नेमणूक करण्यात आली आहे .त्यांना प्रशिक्षित केले असून त्यांच्याच स्थानिक  गावात पाच युवक पी आर टी म्हणुन काम करतील , यांच्याकडे जनजागृती तसेच वाघाचे माहिती स्थानिकांना देऊन मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मदत करणार आहेत.
  • वाघाचा वावर असलेल्या परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेला  झाडोरा साफ करण्यात आलेला आहे.वाघाची दहशत असलेल्या ठिकाणी सभोवतालच्या गावातील नागरिकांना वाघ असल्यास सतर्क करण्यासाठी वन विभागाच्या पथकाने वाघ असलेल्या ठिकाणी  पिवळ्या रंगाचे झेंडे लावून नागरिकांना सतर्क राहण्याचे सूचना करण्यात येत आहे.
  • वाघाची दहशत असलेल्या ठिकाणी जनजागृती करून सूचना फलक लावण्यात आले आहेत वाघाचे सहनियंत्रण करण्यासाठी पाच युवकांचे असे एकूण पाच पथक तयार करण्यात आलेले असून त्याच्या कडून वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेऊन असतात .

  हे देखील वाचा :

अबब… केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटी परताव्याचे तब्बल 25 हजार 334 कोटी रुपये येणे बाकी.. !

 

   

 

Comments are closed.