Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमरावतीत अज्ञात रोगामुळे हजाराहून अधिक मेंढ्यांचा मृत्यू !

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धरले धारेवर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, दि. २२ ऑगस्ट :- अमरावती जिल्ह्यातील काळाखडक व जनुना येथील मेंढपाळांच्या एक हजाराहून अधिक मेंढ्यांचा अज्ञात रोगामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र मेंढ्यांचे मृत्यू नेमक्या कोणत्या रोगामुळे होत आहेत, याबाबत अजूनही तेथील पशुसंवर्धन विभागाने जाहीर केलेले नाही, तसेच, या रोगाचा इतर मेंढ्यांमध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तेथे कोणतीही खबरदारीची उपाययोजना राबविण्यात आलेली नाही, याकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत विधानसभेच्या सभागृहाचे लक्ष वेधले.दरम्यान मेंढ्यांमध्ये उद्भवणाऱ्या या संसर्गजन्य आजारावर तातडीने उपाययोजना करुन मेंढपाळांना दिलासा देण्याची मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.

अमरावती जिल्ह्यातील काळाखडक आणि जनुना येथे गेल्या काही दिवसापासून अज्ञात रोगामुळे मेंढपाळांच्या एक हजाराहून अधिक मेंढ्या मृत्यूमुखी पडल्‍या आहेत. मेंढ्यांच्या तोंडाला फोड येणे, अंगात ताप येणे, पायाला जखम होणे अशी लक्षणे दिसत आहेत. अशा प्रकारची लक्षणे ब्लू टंग, पायरेकझिया, तांडखुरी-पायखुरी किंवा प्लुरो न्यूमोनिया या चार आजारात दिसतात. मात्र अजूनही पशुसंवंर्धन विभागाकडून या ठिकाणी मृत होत असलेल्या मेंढ्या नेमक्या कोणत्या रोगाची शिकार आहेत. हे जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे आजारी मेंढ्यांवर अंदाजे उपचार करण्यात येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. या रोगाचा प्रसार अत्यंत वेगाने होत असून रोगाची लक्षणे दिसल्यानंतर अवघ्या तीन दिवसात मेंढ्यांचा मृत्यू होत आहे. हा रोग इतर मेंढ्यांच्यात फैलावू नये म्हणून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरणाची कोणतीही मोहीम राबवण्यात आलेली नाही असेही अजित पवार म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अमरावती जिल्ह्यातल्या काळा खडक आणि जनुना येथे मेंढपाळांची मोठी संख्या आहे. या मेंढपाळांच्याकडे एकूण तीस हजारांच्यावर मेंढ्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने मेंढ्या असतानाही या परिसरात कायमस्वरुपाचा पशुवैद्यकीय दवाखान्याची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील मेंढपाळांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागत आहे. या घटनेची सरकारने गंभीर दखल घेऊन तातडीने पाऊले उचलण्याची मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.

हे देखील वाचा ,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गाव पाड्यांना रस्ते आणि इतर मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा उद्या निर्णायक रस्ता रोको.

गाव पाड्यातील रस्ते मुख्य रस्त्याशी जोडले जाणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.