लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नवी दिल्ली 23, डिसेंबर :- भारतीय सैन्यातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. आज झेमा, उत्तर सिक्कीम येथे लष्कराच्या ट्रकला झालेल्या एका भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या 16 वीर जवांनाना आपला जीव गमवावा लागला आहे. हा ट्रक तीन वाहनांच्या ताफ्यातील होता. तसेच हा ट्रक सकाळी चट्टेनहून थंगूच्या दिशेने निघाले होते. झेमा येथे जाताना, वळण घेत असताना वाहन तीव्र उतारावरून घसरले. यानंतर हा भीषण अपघात झाला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, एन. सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या जीवितहानीमुळे “खूप दुःख” झाले आहे. त्यांच्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे.
हे देखील वाचा :-
Comments are closed.