Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लग्नासाठी जाणाऱ्या कारचा टायर फुटून भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

मुंबई हुन गुजरात कडे लग्नासाठी जात असताना मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूतल्या धानीवरी येथे सूसरी नदीच्या पुलावर इको कारचा मागचा टायर फुटून तोल गेल्याने घडली घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पालघर, दि. २३ जानेवारी: पालघर जिल्ह्यातल्या मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूतल्या धानीवरी इथं एका इको कारचा भीषण अपघात झाला असून या कार अपघात 2 जणांचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झाले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील माहिम परिसरात राहणारे शेख कुटुंब गुजरात वापी या ठिकाणी लग्नासाठी जात होते. त्यावेळी अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानीवरीजवळील सूसरी नदीच्या पुलावर इको कारचा टायर फुटला. यानंतर गाडीचा तोल गेल्याने गाडी पलटी झाली. दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की यात गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातात आईसह एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. या गाडीत लहान मुलांसह 10 जण होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यातील नाझनीन शेख (46), मुझेन शेख (1) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर शाईन नाईक (46), आशिक अली (65), टूबा शेख(6), आतीफा शेख (9), जनाफ शेख(7), जोया शेख(6) आणि ड्रायव्हर अयान नाईक (29) हे सर्व जखमी झाले आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.