Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल्यांचा टिपागड़ जंगलात घातपात घडवण्याच्या उद्देश गडचिरोली पोलिसांनी उधळवून लावला

नक्षल्यांनी पुरुन ठेवलेले एक १२ बोर रायफल, ०२ स्फोटके व ईतर साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,०९ एप्रिल : धानोरा  तालुक्यातील पोलीस मदत केंद्र गैरापत्ती हद्दीतील टिपागड़ जंगल परिसरात नक्षल हे  घातपात घडवण्याच्या उद्देशाने जमिनीमध्ये बॉम्ब पुरून ठेवले असल्याची गोपनिय खबरीच्या आधारे माहिती पोलिसांना प्राप्त होताच गैरापत्ती पोलीस व सिआरपीएफ च्या जवानांना शोधून नक्षल्याचा डाव उधळून लावण्यात मोठे यश आले आहे .

गैरापत्ती पोलीस मदत केंद्राच्या अंतर्गत येत असलेल्या  टिपागड़ जंगल परिसरात नक्षल घातपात घडवण्याच्या उद्देशाने जमिनीमध्ये बॉम्ब पुरून ठेवतातआणि विघातक कृत्य करीत असतात. मात्र  दि ०७ एप्रिल  रोजी सकाळी ११:०० ते १२:०० वा. दरम्यान जंगल परिसरात मिळालेल्या गोपनिय खबरीच्या आधारे माहिती प्राप्त होताच गैरापत्ती पोलीस व सिआरपीएफ चे नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जवानांना नुकसान पोहचवण्याच्या उद्देशाने संशयीत ठिकाणी लपवून ठेवलेले नक्षल साहित्य शोधुन काढण्यात पोलीस जवानांना मोठे यश आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेत पोलीस जवानांना घत्नास्थाळी मिळालेल्या  साहित्यामध्ये १२ बोर रायफल, देशी बनावटीचे ०२ स्फोटके, नक्षल लिखाण साहित्य, बॅनर, शुज व ईतर दैनंदिन वापराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र वस्फोटक साहित्यांचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरून ठेवतात, अशा पुरून ठेवलेल्या साहित्यांच्या वापर नक्षलवायांकडून नक्षल सप्ताह तसेच ईतर प्रसंगी केला जातो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल , अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता , अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख (अहेरी) व उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा  स्वप्नील जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. अभियानात सहभागी असलेल्या गैरापत्ती पोलीस पार्टीच्या जवानांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे. तसेच जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्याचे सांगितले असून, नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक घाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जिवन जगण्याचे आवाहन केले आहे.

हे देखील वाचा ,

पालघर जिल्ह्यात 2023 मध्ये पहिला कोरोनाने मृत्यू

अवैध सागवान तस्करी रोखण्यासाठी आंतरराज्यीय (महाराष्ट्र-तेलंगाना) समन्वय सभेचे आयोजन संपन्न

Comments are closed.