Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

22 जुलै ला गडचिरोली जिल्ह्यातील सीमा क्षेत्रातील सर्व अंगणवाडी, शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद.

पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता जिल्हाधिकारी बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 21 जुलै – गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात मागील ५ दिवसांपासून काही भागात मुसळधार पाऊसासह अतिवृष्टी झालेली असून गोदावरी, प्राणहिता, बांडिया, पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती इ. नद्यांच्या पाण्याची पातळी ही वाढत असून सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने बरेच अंतर्गत मार्ग बंद आहे तसेच भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक कार्यालय, नागपूर व हैद्राबाद द्वारा आज दि. २१ जुलै, २०२३ द्वारा प्रसारित हवामान संदेशानुसार पुढील २४ तासाकरिता गडचिरोली / चंद्रपूर जिल्हा व गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता, गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील तेलंगाणा राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित करुन मुसळधार पाऊसासह अत्याधिक पाऊसाची दाट शक्यता वर्तविली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता मी संजय मीणा, जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत पूरपरिस्थितीवर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये दिनांक २२ जुलै, २०१३ रोजी सर्व अंगणवाडी, शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद करण्याचे आदेश देत आहे.

सदरील आदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.