Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल्यानी केली एका इसमाची हत्या..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 29 मार्च – भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावरील ताडगाव जवळ असलेल्या वळणावर
नक्षल्यानी एका निरअपराध इसमाची हत्या करून मृतदेहाजवळ पत्रके टाकले असून त्यात अशोक तलांडे हा पोलिसांचा खबऱ्या असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

अशोक तलांडे याला दोन दिवस आधीच घरातून घेऊन गेल्याची सूत्राची माहिती असून त्यानंतर काल (दि. २८)च्या रात्री दरम्यान हत्या केली आहे. मृतदेहाजवळ असलेल्या पत्रकात लिहिले आहे की मृतक अशोक तलांडे आणि नातेवाईक परिवाराला ला अनेकदा सुधारण्याची संधी दिली होती. मात्र तो सुधारला नाही. त्यामुळे जन अदालत मध्ये मृत्काला शिक्षा देण्यात आली असून याला एक ठाणेदार जबाबदार असल्याचा”त्या” पत्रकात उल्लेख देखील आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मृतक अशोक तलांडे हा मूळचा दामरंचा येथील रहिवासी असला तरी तो मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नी सोबत भामरागड तालुक्यातील ताडगाव परिसरात राहत होता. अशोक हा अत्यंत गरीब असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचा. त्याच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असल्याची माहिती आहे. सदर व्यक्ती केव्हा पासून घरून बेपत्ता आहे याची माहिती कळू शकली नाही. मात्र, अशोक हा पोलिस खबरी नसल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत असून काही दिवसांपूर्वी कोलामार्का जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार नक्षल्यांचां खात्मा केला होता. त्यानंतर गुरूवारी देखील छत्तीसगड सीमेवर मध्यरात्री सहा तास चकमक चालली असताना पुन्हा एका निरअपराध इसमाची हत्या झाल्याने जिल्हात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर या घटनेचा तपास ताडगाव पोलीस करीत आहेत तपासांती स्पष्ट होणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.