Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास 100 गावांचा संपर्क तुटलेला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भामरागड, 20 जुलै – गडचिरोली जिल्ह्यातील 14 मार्ग बंद आहेत .त्यापैकी भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास 100 गावांचा संपर्क तुटलेला आहे . सध्या मोबाईल सेवा ही विस्कळीत झालेली आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरून कुणीही आवागमन करू नये. यासाठी आपत्ती व्यवस्थापन तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी नदीच्या पुलावरून जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेट्स लावून रस्ता पूर्णता बंद केलेला आहे. या ठिकाणी स्वतः पोलीस विभागाचे अधिकारी तसेच तहसीलदार प्रत्यक्ष पूरस्थितीचा आढावा घेत आहेत.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.