उद्या सकाळी 11 वाजता होणार समूह राष्ट्रगान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट : स्वराज्य महोत्सवातंर्गत 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगान घेण्यात येणार आहे. यात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था व इतर शासकीय कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता राष्ट्रगीत म्हणण्यात येणार आहे. खाजगी आस्थापनांमध्ये सुद्धा राष्ट्रगीत म्हणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
नागरिकांनी 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आहे त्या जागेवर उपस्थित राहून राष्ट्रगीत म्हणावयाचे आहे. समूह राष्ट्रगीत कार्यक्रमात सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
हे देखील वाचा :
चिमूरच्या विकास आराखड्याबाबत राज्य सरकार सकारात्मक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Comments are closed.