आपले अमूल्य मत दारूसाठी विकणार नाही
जिल्हाभरातील १७० गावांमध्ये लेखी ठराव मुक्तिपथच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 9 एप्रिल- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मुक्तिपथ अभियानांतर्गत दारूमुक्त निवडणुक अभियान सुरू आहे. आतापर्यंत जिल्हाभरातील १७० गावांसह वार्डात ही लोकसभा निवडणुक दारूमुक्त करण्याचा सभा घेऊन, लेखी ठराव घेण्यात आले आहे. उमेदवारांना दारूचे वाटप करू देणार नाही, आपले अमूल्य मत दारूच्या बाटलीसाठी विकणार नाही, असा निर्धार जनतेनी केला आहे.
Comments are closed.