सगळं कसं आत्मिक समाधनासाठी :- देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर 26 ऑक्टोबर :- कुणाचे किती प्रतिज्ञापत्र ? कुणाचे फॉरमॅट आहे ? ही समाज माध्यमांवरील चर्चा फक्त आत्मिक समाधनासाठी आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. महाराष्ट्रात सध्या शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये ‘खरी शिवसेना कोण’ यावरुन संघर्ष सुरु असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला.याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांवर झळकत आहे. आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद केल्याची ही माहिती समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर नवी माहिती देत भाष्य केले आहे.
Comments are closed.