Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

’70 वर्षांत जे कमवलं ते सगळं विकायला काढलं’,- नाना पटोलें

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, 30 मे :- मोदी सरकारलासात वर्ष पूर्ण झाली आहे. काँग्रेसने राज्यभरात निदर्शनं सुरू केली आहे. ‘7 वर्षात मोदी सरकारने 70 वर्षामध्ये जे कमवलं ते सगळं विकायला काढलं आहे’ अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

मुंबई काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या कार्यकाळाचा निषेध करण्यासाठी निदर्शनं करण्यात आली. ‘कोरोना काळात WHO ने काही सूचना केल्या होत्या. पण त्या सुचनांकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलं. त्यामुळे देशात कोरोनाची परिस्थितीत बिकट झाली, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

7 वर्षात मोदी सरकारने 70 वर्षांमध्ये जे कमवलं ते सगळं विकायला काढलं आहे त्यामुळे आम्ही निषेध आंदोलन करतोय. इंधन दरवाढीवर आम्हाला बोलण्या ऐवजी तुम्ही वाढीव कर केंद्रातून कमी करा, 22 टक्के कर का घेतला जातोय, असा थेट सवाल पटोले यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना विचारला.

‘आज देशात लस मिळत नाही आहे, पण फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये लस दिली जात आहे, मोदी सरकारचे हे धोरणंच आहे सुटा बुटातील हे सरकार आहे, यांना फक्त श्रीमंत लोकांची काळजी आहे का? असा सवालही पटोले यांनी उपस्थितीत केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.