Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काश्मिरचे काही पाक धार्जिणे नेते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमोल तपासे,
सीताबर्डी,नागपूर

भारत मातेच्या भालेवर भळभळणारी जखम म्हणजे काश्मिरचे कलम 370 व 35 ए हे भारतीय घटनेतून काढूण टाकल्याने देशद्रोहयांचा जळफळाट झाला. भारताचे अन्न्‍ा खायचे आणि पाकडयांचे गुणगान करायचे हा त्यांचा राजकीय धंदा आता बंद झाला आहे. त्यामुळे देशविरोधी आतंकवादाचे जंतु वळवळतांना दिसतात. सतत आतंकवादयांची दाढया कुरवाळणारे मुफती आणि अब्दुला परीवाराची जम्मु आणि काश्मिर जहागीरी चालत होती. त्यांना पाकडयांचे समर्थन होते. 5 ऑगस्टं 2019 सुवर्ण भाग्याचा दिवस देशभक्तीच्या कणखर नेतृत्वामुळे उगविला काश्मिरचे 370 वे कलम अस्ताला गेले. अब्दुला आणि मुफती परीवाराची काश्मिरवरील ठेकेदारी संपुष्टात आली. चीनच्या मदतीने 370 वे कलम परत आणू अशी गरळ फारूख‍ अब्दुला ओकतांय, त्याच बरोबर महेबुबा मुफती काश्मिरचे 370 चे कलम परत आणल्याशिवाय तिरंगा हाती घेणार नाही अशी बरगळली भारतीय राष्ट्र्ध्वजाचा अपमान केला आहे. करोडो भारतीय अस्मितेचा प्राण असलेला तिरंग्याचा अपमान करण्यास हे देशद्रोही परीवार मागे पाहणार नाही . देशद्रोही परीवाराला फक्त्‍ काश्मिरातील आतंकवादी पोसण्यासाठी सत्ता पाहिजे आहे. मुफती मेहबुबांनी आंतंकवादी बुरहान वाणी चे गोडवे गायले होते. आतंकी काश्मीरचा विकास करतात काय ? पाकडयांच्या समर्थनाने भारतीय निष्पाप नागरीकांचा बळी घेण्याचे पापात हे देशद्रोही परीवार सहभागी आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काश्मिरला स्वताची जहागिरी समजणा-या या आतंकवादी पालन पोसन करणा-या परीवाराची भारत सरकारने सुरक्षा व्यवस्था काढून टाकली पाहिजे. पाकधार्जिणे काश्मीरी नेत्यांना पाकडयांचे गुणगान करण्यासाठी, भारतीयांचा पंचप्राण असणा-या तिरंगा ध्वजाचा अपमान करण्यासाठी, लोकशाही देशात धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांगरूण जातीयवाद पसरविणा-या समाजकंटकांना भारतीय जवानांनी सुरक्षा का प्रदान करावी हा तर 130 करोड भारतीयांचा अपमान आहे. अशा पाकधार्जिणे पुढा-यांची सुरक्षा व्यवस्था ताबडतोब काढुण टाकवी. पाकीस्थान हा आतंकवादयांनाचा कारखाना आहे हे सर्वश्रुत आहे. परंतु काश्मिरात दोन परीवार भारताविरूध्द फुटिरतेची बीजे रूजविण्याचे काम करीत आहे. भारत हा एकसंघ देश असल्याचे भारतीय घटना सांगते अब्दुला आणि मुफती यांना भारतीय घटना मान्य नाही असे स्पष्ट होते हे दोन्ही परीवार संविधान बचाव चा आव मात्र आणतात. काश्मिरी आणि भारतीय एकच आहे हे आचरणात आणवयास ते कचरतात.

पाकीस्थानात हिगंलाज मंदिरात नवरात्र उत्सवात मुर्तींची तोडफोड करण्यात आली मुफती आणि अब्दुलाने मौन धारण केले का केले ? हिंदुच्या मंदिरात झालेला हल्ला हा पाकडयांच्या क्रुरतेचा कळस आहे. काश्मिरात हजारो काश्मिरी पंडितांना निर्वासित व्हावे लागले त्यांचा अमानुष छळ झाला ठार मारल्या गेले हे मुफती बेगम अळी मिळी चुप गिळी धोरण अवलंबत होते. अब्दुला आणि मेहबूबांना प्रखर राष्ट्रवाद काय कळणार ? हे केवळ भारताला जमिनीचा तुकडा मानतात. भारतीय जवान अहोरात्र भारतीय सिमेचे रक्षण करतांना त्यांच्यावर हजारोच्या संख्येने दगडफेक करणारे टोळी जमविण्यात धन्यता माननारे मेहबुबा मुफती हया केवळ फुटरतावादी माळ जपत होत्या. जवानांनी शस्त्र चालवू नये उपदेशाचे डोस देत होत्या. त्यांना फक्त्‍ सत्ता हवी होती पण काश्मिरचा विकास नको होता. काश्मिरात विकास नाही म्हणून तेथील तरूण बेरोजगार निराश्यामुळे आतंकवादी कारवायाकडे वळला हे त्यामुळे काश्मिरात मोठया प्रमाणात रक्तपात होत राहिला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जम्मु व काश्मिर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो राहिल. त्यासाठीच भारतीयांचा विश्वास भारत माता या शब्दात भिनला आहे. त्यामुळेच भारताच्या प्रखर नेतृत्वाने काश्मिरला तोडणारे कलम 370 चे निर्दालन केले. फारूख आणि महेबूबा मुफती यांनी कितीही आदळ आपट केली तरी कलम 370 चे परत येणे शक्य नाही. ते पाकीस्थान ही काय चीन काय सर्व दुनिया एक झाली तरी शक्य नाही. पाकधार्जिण्या वळवळणा-या गांडुळांना ठेचण्यास भारतीय नेतृत्व सक्षम आहे.

Comments are closed.